पुणे : केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण आगामी काही काळात बारामती दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यावर जाऊन आढावा घेतला. तसेच बारामतीचा गड आम्ही येत्या लोकसभेच्या निवडणुकीत उध्दवस्त करू असा इशारा त्यांनी दिला आहे. त्याला राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील शरद पवारांवर खोचक टिका केली आहे.
“शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे बाळासाहेबचं भाकीत जर सत्यात उतरत असेल तर”
केंद्राने लोकसभा प्रवास योजना जाहीर केली. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची नियुक्ती केली. त्या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीला आल्या तर पवारांना कळणार सुद्धा नाही आहे, भाजपाचा खासदार कसा दिल्लीला गेला? अशी खोचक टिप्पणी त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. तसेच पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, जेव्हापासून सितारमण यांचा दौरा निश्चित झाला, तेव्हापासून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. तुमच्या घराण्याने ५० वर्षे खूप सेवा केली. आता आराम करा, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
“सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याची भाषा हास्यास्पद “; रविकांत वर्पे
बारामतीत परिवर्तन करायची वेळ आली आहे. बारामती हा बालेकिल्ला नसून, शरद पवारांची एक टेकडी आहे. दोन वर्ष मी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण पोलीस, प्रांत, तहसिलदार यांच्यावर चालते. माझ्यावर केसेस दाखल केल्या. समाजकारण, राजकारणात काम करताना केसेस दाखल होतात. केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा. अजित पवारांनी बंड केलं, तेव्हा २ आमदार सुद्धा आमदार मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या मागे ५० आमदार राहिले, असा टोमणा पडळकर यांनी अजित पवारांना मारला आहे.
सोबतच, देशात अनेकजण निवडणुका 40-40 वर्षे जिंकेल. मात्र त्यांचे गड मोदींच्या नेतृत्वात उध्वस्त झाले. बारामतीचाही गड उध्वस्त करणार. आतापर्यंत कधीही मोठी लढाई बारामतीत झाली नाही. एवढी मोठी लढाई येत्या निवडणुकीत होईल. असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. त्याचबरोबर आम्हाला संघटन मजबुत करायचं आहे. विकासकामे पुढे न्यायाची आहेत. जनतेला आतापर्यंत जे मिळालं नाही ते त्यांच्यापर्यंत पोहाचवायचं आहे, असं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
Read also
- “मुख्यमंत्र्यांच्या नावे 5 दिवसात 500 पेक्षा अधिक गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा विक्रम;”अजित पवार म्हणाले, कॅमेरा..;
- “बावनकुळे सोडा, लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही”
- “तर मग श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवारांना घर सोडून पळून जावं लागेल”; गोपीचंद पडळकर
- “माझी तर ममता बॅनर्जींशी ओळख होती, तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं”; उद्धव ठाकरे
- “भास्कर जाधवांना आपण नेतेपद दिलंय, कारण आता आपल्याला लढायचं”; उद्धव ठाकरे