पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर येणार असून ते पुण्यातील पाच मानाच्या गणपतीचं दर्शन घेणार आहेत. यातच गणेशोत्सवा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी गेल्या 5 दिवसात 500 पेक्षा अधिक गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा विक्रम केला आहे. यातले बहुतांश बाप्पा हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातील असून मुख्यमंत्री अगदी पहाटेपर्यंत दर्शन घेत फिरत होते. असं मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात येत आहे. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टिका केली आहे.
“सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याची भाषा हास्यास्पद “; रविकांत वर्पे
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अगदी कमी कालावधीत एकनाथ शिंदे विविध मुद्दांवरून प्रसिद्धीच्या झोकात आले. प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटण्याचा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चंगच बांधला. आता गणेशोत्सव दरम्यान देखील ते प्रत्येकाच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत. यावरून मुख्यमंत्र्यांच्या गणेश दर्शनाच्या चित्रफिती समाज माध्यावर आहेत. या दर्शन यात्रेवर अजित पवारांनी टिका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री सण आल्यावर कसे काय सक्रिय होतात, आम्ही पण दर्शन घेतो पण कॅमेरा लावत नाहीत. असा शाब्दिक टोला अजित पवारांनी हाणला.
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील वर्षा बंगल्यावर येऊन गणपत्ती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देखील वर्षा बंगल्यावर आले. अशातच काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या.
“राग आल्यावर काहीही करतो, आता मी गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”; चंद्रकांत खैरे
दरम्यान, दोन वर्षापासून कोरोनाचं सावट असल्याने गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यावेळी अनेक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचं संकट काहीसं कमी झाल्याने यंदा गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. आज मुख्यमंत्री पुण्यातील कसबा, श्री तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा या पाच मानाच्या गणपतीचं दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी देखील आज पुणे दौऱ्यावर असून ते पण विविध ठिकाणी कार्यक्रमांना भेटी देणार आहेत.
Read also
- “बावनकुळे सोडा, लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही”
- “तर मग श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवारांना घर सोडून पळून जावं लागेल”; गोपीचंद पडळकर
- “माझी तर ममता बॅनर्जींशी ओळख होती, तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं”; उद्धव ठाकरे
- “भास्कर जाधवांना आपण नेतेपद दिलंय, कारण आता आपल्याला लढायचं”; उद्धव ठाकरे
- “शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे बाळासाहेबचं भाकीत जर सत्यात उतरत असेल तर”