मुंबई : एका तडीपार गुंडाचे ऐकेल एवढा महाराष्ट्र दुबळा नाही, अशी टिका शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. त्याचबरोबर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. आतापर्यंत बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे मला जरा जपूनच बोलावे लागायचे. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचे ते मी बोलेन असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“बावनकुळे सोडा, लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही”
अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. बापाच्या जीवावर जगणाऱ्यानी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याआधी आधी आपली लायकी तपासावी. बापाचे नाव नसते तर आपल्याला एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावे लागले असते. असा टोला अतुल भातखळकरांनी ठाकरेंना लगावला.
“तर मग श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवारांना घर सोडून पळून जावं लागेल”; गोपीचंद पडळकर
उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्या टिकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा आली आहे. त्यामुळे ते अशा पद्धतीची वक्तव्य करीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमित शहा यांच्यावर टिका केल्यानंतर राज्यातील अनेक भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना निशाणावर घेतलं आहे.
“माझी तर ममता बॅनर्जींशी ओळख होती, तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं”; उद्धव ठाकरे
दरम्यान, मुंबई दौऱ्यावर अमित शाह आले असता त्यांनी भाजपच्या कोअर कमिठीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली होती. भाजप आणि शिवसेना युतीमध्ये उद्धव ठाकरेंनी दगा दिला असल्याचं अमित शाह म्हणाले. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोपांच्या फैरी एकमेकांवर सुरू झाल्या तर अनेकांनी एकमेकांवर टिकास्त्र सोडलं.
Read also
- “बारामतीच्या जनतेने ठरवलंय, यावेळी तुमचे ‘सुळे’ नक्की पाडणार”; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी
- तारिख पे तारिख..! शिंदे गटाची कोर्टोत आता नवी मागणी, सुनावणी आणखी पुढं ढकलली
- “आधी फुटलेले तोंड सुधारा, अन् मग अस्मान दाखविण्याच्या वाफा सोडा”; उद्धव ठाकरेंना भाजपने डिवचलं
- “निर्मला सितारमण बिनटाक्याच्या ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर, कुणाला कळणार पण नाही”
- “मुख्यमंत्र्यांच्या नावे 5 दिवसात 500 पेक्षा अधिक गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा विक्रम;”अजित पवार म्हणाले, कॅमेरा..;