मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शिवसेना पक्ष मिळवण्यासाठी राजकीय संघर्ष सुरू आहे. आज झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत शिंदे गटातील वकिलांनी धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तर अगोदर 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकिल कपिल सिब्बल यांनी केली. त्यावर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड यावरील सुनावणी 27 सप्टेंबर पर्यंत ढकलली. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे प्रकरणावर आता तारीख पे तारीख येत असल्याने याचा निकाल कधी लागणार? असा सवाल अनेकांना पडला आहे.
“माझी तर ममता बॅनर्जींशी ओळख होती, तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं”; उद्धव ठाकरे
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही बांजूनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे हा प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयापासून पाच घटनापीठांकडे गेला आहे. तसेच याप्रकरणात आता निवडणूक आयोग देखील सामील झाला आहे. आज झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी युक्तिवाद मांडण्यात आला. शिंदे गटाकडून धनुष्यबाण गोठवलं जावं तर ठाकरेंकडून अपात्रतेवर निर्णय घेण्यात यावा असा युक्तिवाद करण्यात आला पंरतु त्यावर आता न्यायमूर्तींनी पुढे तारीख दिली आहे.
“भास्कर जाधवांना आपण नेतेपद दिलंय, कारण आता आपल्याला लढायचं”; उद्धव ठाकरे
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाकडून धनुष्यबाण गोठवलं जावं अशी मागणी केली जात आहे. मात्र यावर सर्वोच्च न्यायालयात कोणतंही मत मांडण्यात आलं नसल्याने उद्धव ठाकरेंना एक प्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर जेव्हा कुणी निवडणुक चिन्हाबाबत आमच्याकडे प्रकरण घेऊन येते तेव्हा कार्यवाही म्हणून आम्हाला त्यावर निर्णय घेणे बंधनकारक आहे. जरी हे आमदार अपात्र ठरले तरी ते केवळ विधिमंडळ पक्षातून अपात्र ठरतात. राजकीय पक्षातून नाही. आमच्याकडे जे प्रकऱण आले ते राजकीय पक्षासंदर्भात आहे. त्याचा आमदार अपात्रतेशी काही संबंध नाही. आमच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत नाही असा युक्तिवाद निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आला.
“शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे बाळासाहेबचं भाकीत जर सत्यात उतरत असेल तर”
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा राजकीय संघर्ष सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. परंतु अद्यापही त्यावर योग्य प्रकारे निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण आणि शिवसेना नेमकी कुणाकडे जाणार? त्याचा फैसला न्यायालयात प्रलंबित असल्याने दोन्ही बाजूंना धाकधूक लागून राहिली आहे.
Read also
- “आधी फुटलेले तोंड सुधारा, अन् मग अस्मान दाखविण्याच्या वाफा सोडा”; उद्धव ठाकरेंना भाजपने डिवचलं
- “निर्मला सितारमण बिनटाक्याच्या ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर, कुणाला कळणार पण नाही”
- “मुख्यमंत्र्यांच्या नावे 5 दिवसात 500 पेक्षा अधिक गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा विक्रम;”अजित पवार म्हणाले, कॅमेरा..;
- “बावनकुळे सोडा, लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही”
- “तर मग श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवारांना घर सोडून पळून जावं लागेल”; गोपीचंद पडळकर