पुणे । विशेष प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राज्याच्या मंत्रीमंडळातील ‘हेवीवेट’ मंत्री असलेले विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या ‘टीआरपी’ची धास्ती घेतली आहे. भाजपा आणि शिंदे गट यांनी महायुतीचे सरकार स्थापन केल्याचा दावा केला आणि सीएम शिंदे यांनी पायाला अक्षरश: भिंगरी बांधलेली पहायला मिळते. गणेशोत्सव मंडळ, कार्यकर्ते, विविध शहरं आणि वाड्या-वस्त्यांवर मंत्र्यांसोबत आणि माणसांत मिसळून काम करणारे शिंदे महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय होवू लागले आहेत. परिणामी, अजितदादांची चिंता वाढली असून, राष्ट्रवादीच्या विविध भागातील नेत्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यांचे नियोजन करावे, असा फतवा काढल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असताना २०१९ मध्ये विरोधी बाकावर बसावे लागले. फडणवीस विरुद्ध महाविकास आघाडी असा सत्ता संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर राज्यात भाजपा सत्ताधारी पक्ष बनला. मात्र, भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. २०१४ ते २०१९ भाजपाच्या सत्ताकाळात विविध मागण्यांसाठी राज्यात मराठा समाजाचे एकूण ५८विशाल मोर्चे निघाले. त्याकाळात मराठा समाज तत्कालीन सरकारविरोधात संघर्षाची तयारी करुन रस्त्यावर उतरला होता. आता तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होवू नये, याची पुरेपूर काळजी घेत भाजपाने अचूक डाव साधला.
“निर्मला सितारमण बिनटाक्याच्या ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर, कुणाला कळणार पण नाही”
मुख्यमंत्रीपदी मराठा समाजाचा चेहरा असलेले एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करुन भाजपाने एकाच दगडात अनेक पक्षी मारले. शिंदेंना पुढे करुन मूळ शिवसेनेवर दावा करण्यात आला. तसेच, स्व. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार करुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकप्रकारे कोंडी करण्यात आली. शिंदे यांनी मिळालेल्या संधीचे सोने करीत मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यात वर्चस्व कायम ठेवीत उर्वरित महाराष्ट्रात लक्ष केंद्रीत केले.
विशेष म्हणजे, अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या तीन महिन्यांत पाच दौरे केले आहेत. पुण्यातील विविध कार्यक्रम, सभा, संमेलने, बैठका आणि शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर प्रचंड ‘कंट्रोल’ठेवण्याची भूमिका सीएम शिंदे यांची दिसून येते. त्यामुळे बालेकिल्ल्यातच सुरूंग लागल्याची भावना राष्ट्रवादीच्या गोटात निर्माण झाली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या उपस्थितीत स्थानिक कार्यक्रम आणि दौऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
मराठा चेहरा, २०-२० तास काम करण्याची तयारी, लोकसंपर्क असा प्रभाव पाडण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरू लागले. त्यातच बालेकिल्ला पुणे जिल्ह्यात भाजपा आणि स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी सक्रीयता वाढवल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे, भाजपा आणि शिवसेना- शिंदे गटातील खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यासह अनेक माजी आमदार, नेते नव्या सरकारच्या काळात कमालीचे सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत.
परिणामी, एकनाथ शिंदे यांच्या स्टाईलनुसार
पिंपरी-चिंचवडला एकही ‘मास लीडर’ नाही?
“बावनकुळे सोडा, लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही”
पिंपरी-चिंचवड महापालिकेत १५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अनेक स्थानिक नेत्यांना अजित पवार यांनी मोठी राजकीय ताकद दिली. मात्र, भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यासारखा स्वतंत्र प्रभाव असलेला एकही नेता सध्यस्थितीला राष्ट्रवादीकडे नाही. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीकडे संपूर्ण शहरात प्रभावीपणे पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळपर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेला नेता पुढे येत नसल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शहरातील दौरा नियोजित करण्याची परिस्थिती ओढावली जाते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या तीन दिवसांत अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड दौरा नियोजित करण्यात आला आहे. त्यासाठी भाजपाचा प्रभाव असलेल्या किंवा जगता, लांडगे आणि बारणे यांची ‘व्होट बँक’असलेल्या प्रभागांमध्ये अजित पवार यांचे कार्यक्रम लावून आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये २० ते २५ मंडळांना भेटी नियोजित केल्या आहेत. अजित पवार यांनीही दौऱ्याला अनुमती दिल्याचेही बोलले जात आहे. परंतु, नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, विरोधी पक्षनेता, सत्तारुढ पक्षेता, आमदार अशी पदे राष्ट्रवादीकडून मिळूनसुद्धा पक्षाकडे स्थानिक पातळीवर एकही ‘मास लीडर’ नाही का? असा सवाल राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
आता लोक ॲक्सेप्ट करतीय काय?
दुसरीकडे, महाविकास आघाडीची सत्ता अडीच वर्षे असताना पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीतील एकाही नेत्यांनी शहर पातळीवर भाजपाविरोधी वातावरण निर्माण करता आले नाही. याउलट, सत्तांतधर झाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार जगताप, लांडगे कामालीचे सक्रिय झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत २० वर्षे सत्तेत असताना समाविष्ट गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष करणारे राष्ट्रवादीचे नेते आता अजित पवार यांना पुढे करुन गणेशोत्सव मंडळा आरती आणि बैठका घेत आहेत. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘डॅमेज कंट्रोल’साठी होणारे दौरे सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकर ॲक्सेप्ट करतील काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या आग्रहाखातर नियोजित केलेले गणेशोत्सव मंडळाच्या भेटी, बैठका आणि दौरे अजित पवार यांना ‘नायक’ ठरवणार की ‘खलनायक’ हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Read also
- “आमचे मिशन महाराष्ट्र, त्या मिशन अंतर्गत बारामती आहे;” देवेंद्र फडणवीस
- “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावे लागले असते”
- “बारामतीच्या जनतेने ठरवलंय, यावेळी तुमचे ‘सुळे’ नक्की पाडणार”; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी
- तारिख पे तारिख..! शिंदे गटाची कोर्टोत आता नवी मागणी, सुनावणी आणखी पुढं ढकलली
- “आधी फुटलेले तोंड सुधारा, अन् मग अस्मान दाखविण्याच्या वाफा सोडा”; उद्धव ठाकरेंना भाजपने डिवचलं