मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी काल मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. परंतु त्यावर अद्यापही काही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संजय राऊतांचा मुक्काम आणखी किती दिवस तुरूंगातच राहणार त्याकडे सगळ्यांनाच लक्ष आहे.
“बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु..;” जयंत पाटलांचा भाजपला टोला
संजय राऊतांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला पण. त्यावर कधी सुनावणी होते? हे मात्र, स्पष्ट नसले तरी लवकरच सुनावणी होऊ शकते. राऊत यांना ३१ जुलै रोजी इडीने अटक केली होती. तसेच त्यांची पाच सप्टेंबरला न्यायालयीन कोठडी संपली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी इडीने पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊतांची आणखी चौकशी करायची आहे. असं म्हटलं होतं.
अजितदादांना एकनाथ शिंदेंची धास्ती ! ‘सीएम’चा ‘टीआरपी’वाढला : कार्यक्रम, सोहळ्यांसह भेटी-गाठींवर भर
त्याच कारणामुळे संजय राऊतांना पुन्हा न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली. त्यामुळे ते १९ सप्टेंबर पर्यंत कारागृहातच राहतील. जवळपास ३८ दिवसांपासून संजय राऊत कोठडीत आहेत. जामीनासाठी त्यांनी आतापर्यंत दोन ते तीन वेळा अर्ज दाखल केला आहे. परंतु अद्यापही त्यांना जामीन मिळालेला नाही.
Read also
- शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी; पेडणेकर म्हणाल्या, “कितीही काहीही करा, पण..;”
- “आदित्य ठाकरेंची सभा बस स्टॅंड होती, तसेही बस स्टॅंडवर हजार पाचशे लोक जमतातच”; संदिपान भुमरे
- नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; दिल्लीत पंतप्रधानपदाबाबत खलबत्तं
- “सुरक्षारक्षकांचं ऐकणारं काॅंग्रेस नेतृत्व बहुदा थोरातांच ऐकत नसाव”; थोरातांना मनसेचे प्रत्युत्तर
- “राज ठाकरेंकडे पहिल्या सारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही”