जळगाव: बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणात सरकारकडून होत असलेली कारवाई योग्य आहे. या कारवाईनंतर विरोधकांडून सरकारवर आरोप करण्यात येत आहे. या आरोपाला प्रत्त्युत्तर देताना राष्ट्रावादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे म्हणाले की, माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल, असा सवाल त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलत म्हणाले की,जळगाव बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असे नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.
हे पण वाचा: मराठा आरक्षण : संभाजीराजेंनी ठेवली अजित पवारांसमोर अट, “मी चर्चेला येईनच मात्र…”
हे पण वाचा: …येत्या तीन वर्षातच नाना पटोले, अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी
बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला. त्यामुळे हजारो संसार उदध्वस्त झाले. आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा विषय आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शासन होईलच, मग तो लहान असो किंवा मोठा असो.
माझी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून देखील चौकशी सुरू आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो, अशा तिरकस शब्दांत खडसे यांनी विरोधकांना टोला लगावला.
हे पण वाचा: सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा, म्हणजे बोलणाऱ्यांनाही गाडा…असं आहे ना.! – अजित पवार
हे पण वाचा: सविस्तर बातमी : मनसुख हिरेन हत्येचे मास्टरमाइंड प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे – एनआयए
आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात राज्यभरात छापे टाकले. यावेळी १२ जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी काहीजण भाजप नेते गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याचे समजते.