मुंबई: विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडले . यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भाजप-शिवसेना युतीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले . शिवसेना भाजपसोबत पुन्हा युती करणार असल्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळली आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
हे पण वाचा: राज्यात होणार राजकीय भूकंप? सेना-भाजप युतीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!
हे पण वाचा: फडणवीसांनी संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपेल, भास्कर जाधव यांची खोचक टीका
चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखे बोलायचे एक आणि करायचे एक होतील असं माझ्यासारख्या व्यक्तीने अपेक्षित केले नव्हते. शरमेने मान खाली घालण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यासाठी पण मान शरमेने खाली गेली पाहिजे. यांच्यासोबत आपण लढलो, त्यांच्याबरोबर शपथा घेतल्या, मोदींच्या प्रतिमेचा वापर केला आणि काही संबंध नाही असे म्हणून गेलात त्यानेही मान शरमेने खाली घातली पाहिजे, युतीसंबंधी वक्तव्यावर टोला लगावला आहे .
हे पण वाचा: मी फडतूस माणसांविषयी बोलत नाही, नितेश राणे यांच्या टीकेला भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर
हे पण वाचा: प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर; राजकीय भूकंप होणार? नितेश राणेंचं ट्विट
दरम्यान सभागृहात झालेल्या गोंधळावरही पाटील यांनी भाष्य केले . आमच्या कार्यकर्त्याने काही म्हटले असेल तर ते सरकारला म्हटले असेल. सरकार हरामखोर वैगेरे…पण भास्कर जाधव यांना तुम्ही असे कोणी म्हटले नाही. पण भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली, असा आरोप केला असल्याचे पाटील म्हणाले .
सेना-भाजप युती होणार – फडणवीस
राज्यात होणार राजकीय भूकंप? सेना-भाजप युती होणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ३ आठवड्यांपूर्वी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात वैयक्तिक ३० मि. चर्चा झाली. याच गुप्त भेटीनंतर लवकरच राज्यात राजकीय उलथापालथ होणार, या प्रकारच्या चर्चांना उधाण आले. अशातच केंडेनिय मंत्री मंडळाच्या विस्तारात शिवसेना खासदारांना मंत्री पद दिले जाणार, अश्या अफवांना पेव फुटले. या पार्श्वभूमीवर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं आहे.