मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या खळबळजनक लेटरबॉम्बनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमधून नितेश राणे यांनी आगामी काळात महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे सूतोवाच केले आहे. महाराष्ट्रात ‘भगव्या’ च राज्य येते आहे. हीच ती वेळ !!!, असा सूचक मजकूर या ट्विटमध्ये आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात खरंच राजकीय भूकंप होणार का, याविषयी आता चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
हे पण वाचा: प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब: भाजपशी जुळवून घेऊन परत युती करण्याचा उद्धव ठाकरेंना सल्ला
महाराष्ट्रात "भगव्या" च राज्य येते आहे..
हीच ती वेळ !!!
😊😊😊
— nitesh rane (@NiteshNRane) June 20, 2021
प्रताप सरनाईक यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपल्या मनातील भावना बोलून दाखविली. यामध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्यासारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असे प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.
हे पण वाचा: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत; आपण त्यांना पाहिलतं का?
प्रताप सरनाईक यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
साहेब आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. कोरोना काळात आपण प्रचंड मेहनत घेत कुटुंबप्रमुखा प्रमाणे महाराष्ट्र राज्याचा साभांळ केला आहे. त्याबद्दल आपले कौतुक करावे, तितके कमी आहे. आपण बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, दिलेले वचन पूर्ण केले आहे. पण या परिस्थीत जे काही राजकारण सुरु आहे, त्या सत्तेत एकत्र राहुन काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, तसेच आपला पक्ष कमकुवत करत आहे. जर अशी परिस्थी असेल तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळून घेतले बरे आहे. हा माझा वैक्तीत सल्ला आहे. अशा आशेयाचे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
हे पण वाचा: ‘गायब आमदार प्रताप सरनाईक यांचा शोध घ्या’
सरनाईक म्हणाले की, कोणतीही चुक नसताना आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणाकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून ही बदनानमी चालू आहे, त्याला कुठे तरी आळा घालणे गरजेचे आहे. तसेच याप्रकरणामध्ये आम्हाला टार्गेट करत असताना आमच्या कुंटुबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोट आरोप होत आहेत. सुडबुद्धीचे राजकारण चालू आहे. एका आरोपातून जामिन मिळा की दुसऱ्या आरोपात गुंतवण्याच येत आहे. ही यंत्रणा जाणिवपूर्वक आमच्या मागे लागली आहे. हे कोठे तरी थांबायला हवे असे म्हणले आहे.
तसेच पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध आज ही जिव्हाळ्याचे आहेत. ते अजूनही तुटण्याआधी आपण जुळून घेतलेले आपल्या फायद्याचे आहेत. तसेच त्यांचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना होईल. गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेंक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदाराची कामे झटपट होतात, मात्र आपला मुख्यमंत्री असून ही शिवसेनेच्या आमदाराचे कामे होत नाही. भाजपाची युती तोडून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. तसेच राज्यात काँग्रेस राष्ट्रावादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले अशा चर्चाना उधान आले आहे.