ठाणे : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ठाणे परिसरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेल्या काही महिन्यांपासून प्रताप सरनाईक गायब आहे. त्यामुळे ‘ओवळा-माजिवाडा मतदारसंघ वाऱ्यावर, आमदार महोदय कागदावर’, ‘ओवळा-माजीवाड्याचे आमदार हरवले आहेत, आपण त्यांना पाहिलंत का?’ अशा आशयाची पोस्टरबाजी सरनाईक यांच्याविरोधात करण्यात आल्याचं ठाणे परिसरात पाहायला मिळत आहे. सरनाईक यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागानं मोठी चौकशी सुरु केली आहे.
हे पण वाचा : ‘गायब आमदार प्रताप सरनाईक यांचा शोध घ्या’
मागील महिन्यात ED आणि CBI ने प्रताप सरनाईक यांच्या लोणावला इथल्या एका रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकली होती. त्याबरोबर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ED ने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ED ने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती. ही चौकशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच भविष्यात आपण ED ला सहकार्य करण्यासाठीही तयार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते. तत्पूर्वी ईडीने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी २५ नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची ED ने कसून चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते.
हे पण वाचा : “नुसता फोन फिरवला तरी शंभर वेळा हजर होईन” म्हणणारे प्रताप सरनाईक गायब!
टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला १७५ कोटींच्या कंत्राटासाठी ७ कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी २८ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून १०० पैकी फक्त ७० टक्के गार्ड्स वापरले जायचे. ३० टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास १५० च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली होती. यापैकी काही वाटा प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ED ला आहे.
Read Also :
- ‘‘ज्यांच्या काळात ५८ कोटींचा घोटाळा झाला, साखरेचे पोते असणारे ट्रक चोरले गेले…’’ इंद्रजित मोहितेंची पुन्हा एकदा अविनाश मोहितेंवर टीका
- केंद्रीय मंत्रिमंडळात होणार फेरबदल; तब्बल २३ जणांच्या समावेशाची शक्यता!
- राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन ५ जुलैला होणार
- भाजप-काँग्रेसमध्ये वाद; बोलू दिले जात नसल्याच्या आरोपावरुन आमदारांमध्ये वादावादी
- आमच्याकडे चावी आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच उघडू – संजय राऊत