नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रीमडळामध्ये फेरबदल होण्ययाचे चिन्हे दिसत आहे. विशेष म्हणजे यामध्ये फेरबदलही करण्यात येणार आहे. दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षांतील मंत्रालयाच्या कामकाजाचा लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असून २० कॅबिनेट मंत्री व स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावाही घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे केलेली ही प्रक्रिया म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची नांदी समजली जात आहे.
हे पण वाचा: संभाजीराजे यांच्या मागण्याबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक -सतेज पाटील
हे पण वाचा: कोल्हापूरात भर पावसात मुक मोर्चाला, सर्वपक्षीय नेत्यांचा आंदोलनाला पाठिंबा
या बैठकीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन आणि अन्य मंत्री उपस्थित होते. काही कारणांमुळे विदेशी मंत्री एस जयशंकर शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना उपस्थित राहता आले नाही. २०१६ मध्येही अशाच प्रकारे विविध मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला होता. पंतप्रधानांसह ५५ मंत्री सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे आणखी २३ मंत्र्यांचा समावेश करून विस्तार केला जाऊ शकतो.
हे पण वाचा: आमच्याकडे चावी आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच उघडू – संजय राऊत
हे पण वाचा: ‘अजित पवारांनीच गाढवाचा नांगर फिरवण्याचं काम केल आहे’
कॅबिनेट, राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांना पदे देताना कामे पूर्ण करण्याची लेखी रूपरेखा दिली होती. त्यामुळे कामगिरीचा आढावा हा मंत्रिमंडळातील स्थान टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी यांना काही महत्त्वाच्या विभागाच्या कामगिरीचा आढावा घेण्यास निमंत्रित करण्यात आले होते.