मुंबई : राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन येत्या ५ जुलै पासून मुंबईत सुरु होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अधिवेशनाच्या पूर्व तयारीसाठी कर्मचाऱ्यांची उपस्थिती संख्या ५०% हुन १००% करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश आज (१६ जून) पासून लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र्र विधानसभा आस्थापना विभागाकडून यासाठीचे परिपत्रक काढण्यात जाहिर करण्यात आले आहे.
हे पण वाचा : केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील ‘या’ दिग्गजांना मिळणार स्थान?
कोरोनाने देशासह महाराष्ट्रात थैमान घातले होते. त्यामुळे, संचारबंदीचे आदेश अवघ्या राज्यभर लादण्यात आले होते. या आदेशांना राज्य विधिमंडळ वावगे ठरले नाही. त्यामुळे राज्य विधिमंडळातील कर्मचाऱ्याची उपस्थितीबाबत राज्य सरकारने नवी नियमावली जाहिर करत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर निर्बंध घालून त्यामध्ये उपस्थिती संख्यांची मर्यादा ५० टक्क्यांवर आणली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव हळू-हळू कमी होत असल्या कारणाने राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत.
हे पण वाचा : ‘शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार’
त्याचबरोबर ५ जुलैला मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरु होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन नक्की किती दिवसाचे असेल याबाबत औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. परंतू, अधिवेशनाच्या पूर्व तयारीसाठी कर्मचाऱ्यांची उपस्थिती संख्या ५०% हुन १००% करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश आज (१६ जून) पासून लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र विधानसभा आस्थापना विभागाकडून यासाठीचे परिपत्रक काढण्यात जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे सगळ्यांचे ५ जुलै रोजी होणाऱ्या अधिवेशनाकडे लक्ष लागले आहेत.
Read Also :
- केंद्रीय मंत्रिमंडळात होणार फेरबदल; तब्बल २३ जणांच्या समावेशाची शक्यता!
- मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांची उडी; मराठ्यांनो दलाल नेत्यांपासून सावध राहा
- “दिशाभूल करणं छत्रपती घराण्याच्या रक्तात नाही”, मराठा आरक्षणावर उदयनराजेंनी मांडली रोखठोक भूमिका
- शरद पवारांचा मराठा आरक्षणाशी काडी मात्र संबंध नाही
- मराठा आरक्षण : विनायक मेटेंनी ठाकरे सरकारला खेचले न्यायालयात