मुंबई : राज्याच्या विधानसभेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन जोरदार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णीच्या चिखल-राड्यानंतर आज संपले. या दोन दिवसात राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून आत्तापर्यंत कधीही पहिली गेली नव्हती, एवढी आक्रमकता पाहायला मिळाली. दरम्यान या दोन दिवसांत एकमेकांवर केलेल्या चिखलफेकीनंतर, या सर्व घटनाक्रमावर भाष्य करण्यासाठी, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली.
‘‘टप्प्यात आलेल्या भाजपचा महाविकास आघाडी सरकार कडून करेक्ट कार्यक्रम’’
यावेळी, राज्यात होणार राजकीय भूकंप? सेना-भाजप युती होणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ३ आठवड्यांपूर्वी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात वैयक्तिक ३० मि. चर्चा झाली. याच गुप्त भेटीनंतर लवकरच राज्यात राजकीय उलथापालथ होणार, या प्रकारच्या चर्चांना उधाण आले. अशातच केंडेनिय मंत्री मंडळाच्या विस्तारात शिवसेना खासदारांना मंत्री पद दिले जाणार, अश्या अफवांना पेव फुटले. या पार्श्वभूमीवर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं आहे.
“ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आली आहे”- देवेंद्र फडणवीस
“तीस वर्ष सोबत असूनही भाजपसोबत काही घडलं नाही, मग आता काय घडेल?? आणि आता तर मी दोघांच्या (अजित पवार, बाळासाहेब थोरात) मध्ये आहे, यांच्यातून मला बाहेर पडायचं असेल, तर या दोघांना टाळण शक्य आहे, असं तुम्हाला वाटतं का?,” अशा सडेतोड शब्दांत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देऊन, राज्याच्या राजकारणात, अशा प्रकारचा कोणताही राजकीय भूकंप होणार नाहीये हे स्पष्ट केलं.
Read Also :
- कालचा प्रकार बघून मी हि चकीत झालो; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी सोडलं मौन
- “सर्वच केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय?”
- मुख्यमंत्र्यांच्या वन खात्यात बदल्यांसाठी रेट कार्डवर काम सुरु; फडणवीसांनी केला गौप्यस्फोट
- भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार?