मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक होत, पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केलं. तसेच, यावेळी विधानसभेच्या आवारात प्रतिविधानसभा भरवून, त्यांनी ठाकरे सरकारच्या मनमानी कारभाराविरुद्ध निषेध जाहीर केला आणि अधिवेशनावर बहिष्कार घातला. मात्र, सत्ताधारी पक्षांतील आमदारांनी, यावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली आणि अध्यक्षांच्या आदेशाने भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई करण्यात आली.
रिक्त पदं भरण्यास मान्यता देण्यात आलीये; अजित पवारांची सभागृहात महत्वाची माहिती
यावेळी, पत्रकारांना तेथून मार्शलद्वारे हाकलण्यात आलं. त्यांचे कॅमेरे ओढले गेले. भाजप नेत्यांनी घेतलेले माईक, स्पीकर ताब्यात घेण्यात आले. तसेच, त्यांना विधानसभेच्या आवारातून हाकलण्यात आले. यानंतर भाजप नेत्यांनी आपला मोर्चा पत्रकारांच्या दालनाकडे वळवला आणि तिथे माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी, ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
“ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आली आहे”- देवेंद्र फडणवीस
“राज्यात ठाकरे सरकारने आणीबाणी लावली आहे. आमच्याकडून सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येत आहे आणि म्हणूनच आता सरकारने ही दडपशाही सुरु केली आहे. आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून, आमच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. माध्यमांवर मार्शल आणून मुस्काटदाबी करण्यात येत आहे. सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटं बोलणं सुरु आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
फोन टॅपिंग प्रकरणावरून नाना पटोले आक्रमक, गृहमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची घोषणा
‘तसेच, माईक काढला, तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. या सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार, ही आणीबाणी आहे. सरकारकडून लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम सुरु आहे,” अशी टीका करत त्यांनी, “मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. त्यांच्याच वन खात्यात बदल्यांसाठी रेट कार्डवर काम सुरु असून, ५-१० लाख एका बदलीसाठी घेतले जात आहेत. मी मुख्यमंत्री पैसे घेतात, असं मी म्हटलेलं नाही, पण त्यांच्या खात्यात असं घडत असताना, यावर कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Read Also :
- भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार?
- “…नाहीतर या सरकारने मला क्लिन चिट द्यावी”, प्रताप सरनाईकांची सभागृहात मोठी मागणी
- कराडमधील मोर्चा अंगलट; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा दाखल
- “आत म्हणतात तुमचा देशमुख करून टाकू, बाहेर म्हणतात भुजबळ करून टाकू; हीच तर भाजपची गुंडवृत्ती”