मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी झाल्यानंतर, आजच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी, भाजपने कालच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या घटनेचा निषेध म्हणून, विधानसभेतल्या कामकाजावर बहिष्कार टाकत, विधानसभेच्या आवारात प्रतिविधानसभा भरवली. यावर विधानसभेतील सत्ताधारी आमदारांनी, लागलीच कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आणि त्यांच्या आदेशानुसार विरोधकांकडे असलेली कागदपत्रे, माईक, स्पीकर जप्त करून, त्यांना विधानसभा भवनाच्या आवारातून हाकलून लावण्यात आले.
सात वर्षे केंद्रात भाजपची सत्ता, जनगणना सदोष होती तर त्यात दुरुस्ती का केली नाही?
दरम्यान, सभागृहाच्या आत देखील वातावरण चांगलेच गरम झाले असल्याचे आजच्या दिवशी पाहायला मिळत असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी, सभागृहात बोलताना तत्कालीन फडणवीस सरकारवर, फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. “२०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला. मी त्यावेळेची खासदार होतो. माझा फोन टॅप करून, माझं नाव ‘अमजद खान’ ठेवलं गेलं. माझ्यासोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पीए, खासदार संजय काकडे यांचे देखील फोन टॅप करण्यात आले,” असा घणाघात त्यांनी केला.
“विरोधक आमच्यावर बॉम्ब फोडणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला”
“माझा फोन टॅप करून, मला मुसलमानाचं नावं का दिलं गेलं? माझंच नाव टाकायला हवं होतं,” असं म्हणत त्यांनी, “अशा प्रकारे कृत्य करून, हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून, धर्माच्या नावाने राजकारण करून, राज्य पेटवायचं हा सरकारचा उद्देश होता का?, हे फोन, टॅप करण्याची गरज काय होती? यामागे कोण आहे? हे कुणाच्या आदेशाने झाले?,” असे सवाल करत, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाजपाने भरवली प्रतिविधानसभा; फडणवीसांनी मांडला धिक्कार प्रस्ताव
दरम्यान, यावेळी विधानसभा अध्यक्षांनी या मुद्द्यावर राज्याचे गृहमंत्री यांना विचारले असता, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची, उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाईल आणि त्याची माहिती सभागृहाला देण्यात येईल,” अशी घोषणा केली आहे.
Read Also :
- आमदार रवी राणांनी राजदंड पळवला; मार्शलच्या सहाय्याने राणांची सभागृहातून हकालपट्टी
- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा देशपातळीवर सन्मान
- ‘त्या’ १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयात जायचे असेल जाऊ द्या, निलंबन रद्द होणार नाही”
- मोठी बातमी: भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; पत्रकारांनाही हाकालले, कॅमेरे हिसकावून घेतले
- त्यांना परवानगी दिली कोणी; भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल