मुंबई : विरोधकांशिवाय विधानसभेचं कामकाज सुरु झालं आहे. भाजपचं विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने प्रतिविधान सभा सुरू केली आहे. भाजपच्या प्रतिविधानसभेवर आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केल आहे. भाजपला परवानगी दिली कोणी, विधानसभेच्या आवारात परवानगीशिवाय काहीही करता येत नाही, विरोधक तिथे स्पीकर लावून भाषणं देत आहेत, त्यांच्याकडे परवानगी नाही, परवानगी नसताना भाजपकडून सभा सुरु, भाजपकडून नियमांचं उल्लंघन सुरू आहे, असे जावध यांनी म्हटे आहे.
“विरोधक आमच्यावर बॉम्ब फोडणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला”
ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून विधानसभेत सोमवारी मोठा गदरोळ झाला. या गदारोळानंतर भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं. या कारवाईचे आज सभागृहाबाहेर पडसाद उमटले. भाजपाने आक्रमक भूमिका घेत राज्यात विविध ठिकाणी तसेच विधिमंडळाबाहेर आंदोलन सुरू केलं. त्याचबरोबर विधिमंडळ परिसरात प्रतिविधानसभा भरवण्यात आली. या प्रतिविधानसभेत सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला असून, भाजपाच्या प्रतिविधानसभेवर विधानसभेत आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, अध्यक्षांनी तसे आदेश दिले आहेत.
नागपुरात १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन, महाविकास आघाडी सरकारचा पुतळ्याची जाळपोळ
“विरोधकांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नाही”
भास्कर जाधवांनी मांडलेल्या प्रश्नांवर विधानसभा उपाअध्यक्षांचं उत्तर दिल आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी परवानगी मागितलीच नाही. त्यामुळे, विरोधकांवर कारवाईची सत्ताधाऱ्यांची मागणी केली आहे. दरम्यान, भास्कर जाधवांना धमकीचे फोन येत आहेत. त्यांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Read Also :
- अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, सिल्लोडच्या महिलेचा आरोप, मंत्रालयासमोर आंदोलन
- भाजपच्या नेत्यांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
- देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाची जय्य्त तयारी; नेत्यांचे दौरे वाढले
- “हे अधिवेशन राज्याचं नसून, केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे”
- भाजपाच्या निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट, १२ चाच आकडा गाठण्यामागे नेमकं कारण काय?