मुंबई : विधानसभा सभागृहात विषय मांडू दिला नाही म्हणून आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवला आहे. रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या समस्या विषयी मत मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तालीका अध्यक्षांनी मत मांडायला संधी दिली नसल्याने रवी राणा यांनी सरळ राजदंड पळवला. त्यामुळे तालीका अध्यक्षांनी मार्शलच्या सहाय्याने रवी राणा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, राजदंड पळवल्याने सभागृहाचं कामकाज थांबत नाही, असं भास्कर जाधाव म्हणाले.
मोठी बातमी: भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; पत्रकारांनाही हाकालले, कॅमेरे हिसकावून घेतले
रवी राणा हे शेतकऱ्यांचा विषय मांडत होते. ते महत्वाच्या व शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय मांडल असल्याचे तालीका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले. परंतू रवी राणाला विषय मांडताना बोलू न दिल्यामुळे त्यांनी सरळ राजदंडच पळवला. परंतू राजदंड पळवल्या नंतरही अधिवेशनाचे कामकाज बंद पडेल नाही, त्यामुळे ठाकरे सरकारकडून नियमांची पायमल्ली होत आहेत का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहेत.
त्यांना परवानगी दिली कोणी; भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल
दरम्यान, भाजपाने भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात भास्कर जाधव यांनी सभागृहात आवाज उठवला. प्रतिविधानसभा घेण्यास परवानगी दिली आहे का?, तिथे कागद वाटले जात आहेत. स्पीकर लावण्यास परवानगी दिलीये का? आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर मलिक यांनी पाठिंबा देत काही विषय मांडले. अधिकार नसताना माजी आमदार यात कसे सहभागी होत आहे. काल झालेल्या गदारोळावेळी आम्ही मार्शलला बोलवलं, पण कुणीही आलं नाही. या सभागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला जाब विचारावा, अशी मागणी मलिक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले. स्पीकर वापरण्यासंदर्भात परवानगी दिलेली नाही. तसेच बाहेर जे बोललं जात आहे, तेही तपासून घेतलं जाईल, असं अध्यक्षांनी सांगितलं. तसंच प्रतिविधानसभेत वाटल्या जाणारे कागद वाटणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही अध्यक्षांनी दिले.
Read Also :
- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा देशपातळीवर सन्मान
- ‘त्या’ १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयात जायचे असेल जाऊ द्या, निलंबन रद्द होणार नाही”
- मोठी बातमी: भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; पत्रकारांनाही हाकालले, कॅमेरे हिसकावून घेतले
- त्यांना परवानगी दिली कोणी; भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल
- अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, सिल्लोडच्या महिलेचा आरोप, मंत्रालयासमोर आंदोलन