मुंबई : भाजपच्या प्रतिविधानसभेवरुन सत्ताधारी सभागृहात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अध्यंक्षांनी भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई करण्यात आली आहे. भाजपकडून प्रतिविधानसभेतील माईक, स्पीकर ताब्यात घेण्यात आले. शिवाय पत्रकार, प्रतिनिधिंना देखिल हाकालण्यात आले आहे. मार्शल पाठवून कारवाई करण्यात आली असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोक केला जात आहे.
अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, सिल्लोडच्या महिलेचा आरोप, मंत्रालयासमोर आंदोलन
भाजपाने भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात भास्कर जाधव यांनी सभागृहात आवाज उठवला. प्रतिविधानसभा घेण्यास परवानगी दिली आहे का?, तिथे कागद वाटले जात आहेत. स्पीकर लावण्यास परवानगी दिलीये का? आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर मलिक यांनी पाठिंबा देत काही विषय मांडले. अधिकार नसताना माजी आमदार यात कसे सहभागी होत आहे. काल झालेल्या गदारोळावेळी आम्ही मार्शलला बोलवलं, पण कुणीही आलं नाही. या सभागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला जाब विचारावा, अशी मागणी मलिक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले. स्पीकर वापरण्यासंदर्भात परवानगी दिलेली नाही. तसेच बाहेर जे बोललं जात आहे, तेही तपासून घेतलं जाईल, असं अध्यक्षांनी सांगितलं. तसंच प्रतिविधानसभेत वाटल्या जाणारे कागद वाटणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही अध्यक्षांनी दिले.
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाची जय्य्त तयारी; नेत्यांचे दौरे वाढले
खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केलं जातंय
प्रतिविधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. “शेतकरी, ओबीसी, मराठा, मागासवर्गीय, विद्यार्थी, एमपीएससी, विम्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवला, तर खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केलं जातंय… जे घडलंच नाही; ते घडलं आहे, असं सांगून धादांतपणे खुर्चीवरुन खोट बोलून आमदारांना निलंबित केलं जातं म्हणून आज या विधानसभेत मी या सरकाच्या धिक्काराचा आणि निषेधाचा प्रस्ताव याठिकाणी ठेवतो आहे,” असं फडणवीस म्हणाले.
“विरोधक आमच्यावर बॉम्ब फोडणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला”
“विरोधकांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नाही”
भास्कर जाधवांनी मांडलेल्या प्रश्नांवर विधानसभा उपाअध्यक्षांचं उत्तर दिल आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी परवानगी मागितलीच नाही. त्यामुळे, विरोधकांवर कारवाईची सत्ताधाऱ्यांची मागणी केली आहे. दरम्यान, भास्कर जाधवांना धमकीचे फोन येत आहेत. त्यांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Read Also :
- त्यांना परवानगी दिली कोणी; भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल
- अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, सिल्लोडच्या महिलेचा आरोप, मंत्रालयासमोर आंदोलन
- भाजपच्या नेत्यांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
- देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाची जय्य्त तयारी; नेत्यांचे दौरे वाढले
- “हे अधिवेशन राज्याचं नसून, केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे”