मुंबई : संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागून राहिलेल्या बहूप्रतिक्षीत अश्या राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाचा ठराव मंजुर होत असताना अभूतपूर्व गोंधळ झाला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी, भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षाकरिता निलंबन करण्यात आले.
भाजपच्या नेत्यांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चांगलीच जुंपली असून, या घटनेनंतर या सर्वच्या सर्व निलंबित आमदारांनी राज्यपालांसमोर, पत्राद्वारे वस्तुस्थिती मांडली आणि दाद मागितली. आता हे सर्व आमदार या निर्णयाविरुद्ध उच्च नायायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपाने भरवली प्रतिविधानसभा; फडणवीसांनी मांडला धिक्कार प्रस्ताव
यावर, काल महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी, आज अधिवेशन भरण्याआधी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी या कारवाईचे समर्थन करत, “सर्वोच्च न्यायालयात जाऊनही या निर्णयाविरोधात भाजप गेले, तरी त्याचा फायदा होणार नाही,” असं म्हणत या कारवाईचं समर्थन केलं आहे.
“विरोधक आमच्यावर बॉम्ब फोडणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला”
याबाबत अधिक बोलताना त्यांनी, “काल मी ठराव मांडत असताना, फडणवीस आधी बोलले. त्यानंतर मी त्यांच्यासमोर न्यायालयाने सांगितलेला निर्णय आणि पत्र ठेवत सरकारचा मुद्दा मांडला. महामारीमुळे माहिती गोळा करण्यात अडचणी आहेत, म्हणून आम्ही केंद्राकडे डेटा मागतोय, पण अचानक गोंधळ सुरू झाला आणि पुढे जे झाले, ते राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात कधीही घडले नाही,” असं म्हटलं आहे.
सात वर्षे केंद्रात भाजपची सत्ता, जनगणना सदोष होती तर त्यात दुरुस्ती का केली नाही?
“सर्वोच्च न्यायालयानेच म्हटले आहे की, सभागृहात होत असणारे बेशिस्त वर्तन हे लोकशाहीला धोकादायक आहे. त्यावर उचित कारवाई केली गेली पाहिजे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देशही दिले आहेत, असं असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे, हे १२ आमदार न्यायालयात गेले तरीही त्यांना काहीही फायदा होणार नाही. तालिका अध्यक्षांच्या दालनात जे झालं, ते सर्वश्रुत आहे. त्यांच्या गैरवर्तनामुळेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात जायचे असेल जाऊ द्या, मात्र निलंबन रद्द होणार नाही,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Read Also :
- मोठी बातमी: भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; पत्रकारांनाही हाकालले, कॅमेरे हिसकावून घेतले
- त्यांना परवानगी दिली कोणी; भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल
- अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, सिल्लोडच्या महिलेचा आरोप, मंत्रालयासमोर आंदोलन
- भाजपच्या नेत्यांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
- देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाची जय्य्त तयारी; नेत्यांचे दौरे वाढले