मुंबई : कालच्या जोरदार राड्यानंतर, आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने, विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केलं आणि नंतर तिथेच प्रतिविधानसभा उभी करून, विधानसभेच्या आजच्या अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. याला भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाची देखील पार्श्वभूमी होती. याठिकाणी भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. तसेच, ठाकरे सरकारच्या कारभारावर सडकून टीकाही करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
“ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आली आहे”- देवेंद्र फडणवीस
दरम्यान, यांनतर आज त्या घटनेविषयी सभागृहाला विस्तृतपणे सांगताना भास्कर जाधव यांनी, “कालच्या घटनेनंतर मला आणि माझ्या कुटुंबियांना समाज माध्यमांवर त्रास दिला जात असून, मला धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, मी आतापर्यंत कोणतही संरक्षण घेतलं नाही. माझ्यासोबत साधा काॅन्सटेबलही नाही. मी संरक्षण मागणार नाही. मला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत्यांनी आणि आमदारांनी मला धमकी दिली आहे,” असं सांगितलं.
फोन टॅपिंग प्रकरणावरून नाना पटोले आक्रमक, गृहमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची घोषणा
यावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, यावर भाष्य करताना, भास्कर जाधवांना समाज माध्यमांवरून काही लोकं धमक्या देत आहेत. उद्या त्यांच्या जिवाला काही बरं-वाईट झालं, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत, या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या बोलण्यानंतर गृहमंत्र्यांनी, “तालिका अध्यक्षांना त्यांची इच्छा असो किंवा नसो, त्यांना संरक्षण देण्यात येईल,” असं सांगितलं आहे.
Read Also :
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार?
- “…नाहीतर या सरकारने मला क्लिन चिट द्यावी”, प्रताप सरनाईकांची सभागृहात मोठी मागणी
- कराडमधील मोर्चा अंगलट; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा दाखल
- “आत म्हणतात तुमचा देशमुख करून टाकू, बाहेर म्हणतात भुजबळ करून टाकू; हीच तर भाजपची गुंडवृत्ती”
- रिक्त पदं भरण्यास मान्यता देण्यात आलीये; अजित पवारांची सभागृहात महत्वाची माहिती