मुंबई : दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, ओबीसी आरक्षणाविषयाच्या ठरावावेळी, भाजपच्या १२ आमदारांनी हौदात पुढे येऊन जोरदार घोषणाबाजी केली, गोंधळ घातला, तालिका अध्यक्षांसमोरील माईक काढून घेतला. यावेळी दोन्हीकडून झालेल्या जोरदार गोंधळातच हा ठराव मंजूर करण्यात आला आणि कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
भास्कर जाधवांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या, केली सुरक्षा पुरवण्याची मागणी
दरम्यान, कामकाज सुरु झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी, “या दरम्यानच्या १० मिनिटांत भाजप नेत्यांनी केबिनमध्ये गर्दी करून मला धक्काबुक्की केली. तसेच, मला माझ्या आई-बहिणींवरून शिवीगाळ केली,” असा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप, सभागृहात सगळ्यांसमोर भाजप आमदारांवर केला आणि या गैरवर्तनामुळे भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेण्यात येत असल्याचे सांगत, हा ठराव मंजूर केला. यांनतर सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले.
‘त्या’ १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयात जायचे असेल जाऊ द्या, निलंबन रद्द होणार नाही”
आता या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही पहायला मिळत असून, याचाच संदर्भ देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, “कालच्या गोंधळानंतर एक सदस्य भास्कर जाधवांना सांगत होते की, मध्ये बोललात तर तुमचाही अनिल देशमुख करून टाकू आणि बाहेर बोललात तर भुजबळ करून टाकू, अशा दहमक्या या सभागृहात दिल्या जात आहेत. भाजपाचं राजकारण हे गुंड प्रवृत्ती आणि राडा करणाऱ्या प्रवृत्तीचं आहे. महाराष्ट्रात असं राजकारण कधी झालं नाही,” असा हल्लबोल त्यांनी भाजपवर केला आहे.
मोठी बातमी: भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; पत्रकारांनाही हाकालले, कॅमेरे हिसकावून घेतले
तसेच, फोन टॅपिंगसंदर्भात बोलताना त्यांनी तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “२०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला. मी त्यावेळेची खासदार होतो. माझा फोन टॅप करून, माझं नाव ‘अमजद खान’ ठेवलं गेलं. माझ्यासोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पीए, खासदार संजय काकडे यांचे देखील फोन टॅप करण्यात आले,” असा घणाघात त्यांनी केला.
सात वर्षे केंद्रात भाजपची सत्ता, जनगणना सदोष होती तर त्यात दुरुस्ती का केली नाही?
“माझा फोन टॅप करून, मला मुसलमानाचं नावं का दिलं गेलं? माझंच नाव टाकायला हवं होतं,” असं म्हणत त्यांनी, “अशा प्रकारे कृत्य करून, हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून, धर्माच्या नावाने राजकारण करून, राज्य पेटवायचं हा सरकारचा उद्देश होता का?, हे फोन, टॅप करण्याची गरज काय होती? यामागे कोण आहे? हे कुणाच्या आदेशाने झाले?,” असे सवाल करत, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Read Also :
- रिक्त पदं भरण्यास मान्यता देण्यात आलीये; अजित पवारांची सभागृहात महत्वाची माहिती
- अधिवेशनातील ‘त्या’ कारवाईचे पुण्यात पडसाद; मोगलाई सरकारचा भाजपकडून तीव्र निषेध
- अधिवेशनातील ‘त्या’ कारवाईचे पुण्यात पडसाद; मोगलाई सरकारचा भाजपकडून तीव्र निषेध
- फोन टॅपिंग प्रकरणावरून नाना पटोले आक्रमक, गृहमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची घोषणा
- आमदार रवी राणांनी राजदंड पळवला; मार्शलच्या सहाय्याने राणांची सभागृहातून हकालपट्टी