मुंबई : काल पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना, भाजप आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी आक्रमक आमदारांनी, पुढे हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि गोंधळ घातला. एका आमदाराने तालिका अध्यक्षांचा माईक ओढला, तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली, असा आरोप या आमदारांवर केला गेला असून, या झालेल्या गदारोळात धक्काबुक्की देखील झाली असल्याचा आरोप केला गेला आहे; परिणामी या १२ आमदारांचं १ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
“विरोधक आमच्यावर बॉम्ब फोडणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला”
दरम्यान, याचा निषेध म्हणून भाजपकडून आज, विधानसभेतल्या कामकाजावर बहिष्कार टाकत विधानसभेच्या आवारात प्रतिविधानसभा भरवण्यात आली आहे. तेथे स्पीकरवर भाषणबाजी केली जात आहे. गोपनिय कागद वाटले जात आहेत. त्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी भास्कर जाधव यांनी, विधानसभेत केली. यावर अध्यक्षांनी ती कागदपत्रे, माईक, स्पीकर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपाने भरवली प्रतिविधानसभा; फडणवीसांनी मांडला धिक्कार प्रस्ताव
तसेच, कालच्या घटनेनंतर मला आणि माझ्या कुटुंबियांना समाज माध्यमांवर त्रास दिला जात असून, मला धमक्या दिल्या जात आहेत. मात्र , मी आतापर्यंत कोणतही संरक्षण घेतलं नाही. माझ्यासोबत एक साधा काॅन्सटेबल सुद्धा नाही. मी संरक्षण देखील मागणार नाही. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत्यांनी आणि आमदारांनी मला धमकी दिली,” असं सांगितलं. यानंतर, हाच संदर्भ घेऊन नवाब मलिक यांनी, भास्कर जाधवांना समाज माध्यमांवरून काही लोकं धमक्या देत आहेत. उद्या त्यांच्या जिवाला काही बरं-वाईट झालं, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत, या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
भाजपच्या नेत्यांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
दुसरीकडे फडणवीसांनी, “भास्कर जाधवांकडून आम्हाला धोका आहे, हे आमच्या काल लक्षात आलं. काल त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि वरुन तेच म्हणतात; की मला शिव्या दिल्या. त्यामुळे त्यांना आमच्यापासून धोका हे धादांत खोटं आहे,” असा उलट आरोप फडणवीसांनी भास्कर जाधव यांच्यावर केला आहे.
Read Also :
- ‘त्या’ १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयात जायचे असेल जाऊ द्या, निलंबन रद्द होणार नाही”
- मोठी बातमी: भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; पत्रकारांनाही हाकालले, कॅमेरे हिसकावून घेतले
- त्यांना परवानगी दिली कोणी; भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल
- अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, सिल्लोडच्या महिलेचा आरोप, मंत्रालयासमोर आंदोलन
- भाजपच्या नेत्यांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी