मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सभागृहाच्या आत ओबीसी आरक्षण ठरावाच्या मंजुरीवेळी प्रचंड गोंधळ उडालेला पाहायला मिळाला, तर आज विधानसभेबाहेर भाजप नेत्यांनी प्रतिविधानसभा भरवत, सरकारच्या मनमानी कारभार आणि १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईविरुद्ध, प्रचंड गोंधळ घालत निषेध नोंदवला. दरम्यान, यावर सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी आवाज उठवला आणि अध्यक्षांना भाजप नेत्यांवर कारवाई करण्याचे मागणी केली. या आदेशानंतर विरोधकांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांना विधानसभेच्या आवारातून हाकलून देण्यात आलं.
मोठी बातमी: भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; पत्रकारांनाही हाकालले, कॅमेरे हिसकावून घेतले
यावेळी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “राज्यात ठाकरे सरकारने आणीबाणी लावली आहे. आमच्याकडून सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येत आहे आणि म्हणूनच आता सरकारने ही दडपशाही सुरु केली आहे. आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून, आमच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. माध्यमांवर मार्शल आणून मुस्काटदाबी करण्यात येत आहे. सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटं बोलणं सुरु आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लबोल केला आहे.
सात वर्षे केंद्रात भाजपची सत्ता, जनगणना सदोष होती तर त्यात दुरुस्ती का केली नाही?
दरम्यान, पत्रकारांनाही त्या ठिकाणावरून निघून जाण्यास सांगितले. त्यांचे कॅमेरे बंद करण्यात आले. माध्यमांवर मार्शल कडून मुस्काटदाबी करण्यात आली. यावरून देखील सरकारवर निशाणा साधताना, “आम्ही लोकशाहीचा एक स्तंभ असलो, तर पत्रकार लोकशाहीचा दुसरा स्तंभ आहेत. लोकशाहीच्या दोन्ही स्तंभांना कुलूप घालण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. माईक काढला, तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. या सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार, ही आणीबाणी आहे. सरकारकडून लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम सुरु आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
त्यांना परवानगी दिली कोणी; भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल
“या सरकारला आमचा डीएनए माहीत नाही. स्व. इंदिरा गांधींनीही आणीबाणी लादून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण आमचा आवाज त्या दाबू शकल्या नाहीत. आता आम्हाला विधानसभेच्या पायरीवर बसून दिले जात नसेल, तर आम्ही प्रेस रुममध्ये जाऊन प्रतिविधानसभा भरवू,” असे म्हणत सगळ्या भाजप आमदारांनी आपला मोर्चा, माईकशिवाय प्रेस रूमकडे वळवला.
Read Also :
- अधिवेशनातील ‘त्या’ कारवाईचे पुण्यात पडसाद; मोगलाई सरकारचा भाजपकडून तीव्र निषेध
- फोन टॅपिंग प्रकरणावरून नाना पटोले आक्रमक, गृहमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची घोषणा
- आमदार रवी राणांनी राजदंड पळवला; मार्शलच्या सहाय्याने राणांची सभागृहातून हकालपट्टी
- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा देशपातळीवर सन्मान
- ‘त्या’ १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयात जायचे असेल जाऊ द्या, निलंबन रद्द होणार नाही”