मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केलं आणि नंतर तिथेच प्रतिविधानसभा उभी करून, विधानसभेच्या आजच्या अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. याला भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाची देखील पार्श्वभूमी होती. याठिकाणी भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. तसेच, ठाकरे सरकारच्या कारभारावर सडकून टीकाही करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
आमदार रवी राणांनी राजदंड पळवला; मार्शलच्या सहाय्याने राणांची सभागृहातून हकालपट्टी
दरम्यान, बाहेर विरोधी पक्षाकडून असे घमासान सुरु असताना, सभागृहाच्या आत सत्ताधारी पक्षांकडून देखील भाजपवर निशाणा साधण्यात आला. यावेळी शिवसेनेचे, मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे ईडीचा ससेमिरा गेल्या ७ महिन्यांपासून मागे लागलेले, आमदार प्रताप सरनाईक यांनी, “माझ्यावर आरोप, म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप. माझ्यामुळे राज्य सरकारची विनाकारण बदनामी कलेची जात आहे. त्यामुळे, जर मी गुन्हा केला असेल, तर मला शिक्षा द्या; पण जर गुन्हा केलाच नसेल, तर मला ईडीच्या तपासानंतर, राज्याच्या गृहविभागाकडून अर्थात राज्य सरकारकडून क्लीनचिट देण्यात यावी”, अशी मागणी केली आहे.
फोन टॅपिंग प्रकरणावरून नाना पटोले आक्रमक, गृहमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची घोषणा
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाम सुरु झाल्यानंतर, दुपारी १२;१५ च्या सुमारास प्रताप सरनाईक यांनी आपलं म्हणणं मांडलं. तसेच याबाबतचे एक पत्र त्यांनी काल गृहमंत्र्यांकडे दिलं असून, आर्थिक गुन्हे शाखेने लवकरात लवकर तो अहवाल, गृह मंत्रालयाकडे सादर करावा आणि गृहखात्याने तो लोकांपर्यंत पोहोचवावा. मी घोटाळा केला असेल, तर मिळेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण तसं नसेल आणि आर्थिक गुन्हे शाखेचा तपास पूर्ण झाला असेल, तर राज्य सरकारकडून मला क्लिनचिट देण्यात यावी”, अशी मागणी यावेळी प्रताप सरनाईक यांनी केली. तसेच, “मला ईडीकडून विनाकारण त्रास दिला जात आहे. लोकांना भुजबळ, अनिल देशमुख करेन अशी धमकी दिली जात आहे,” अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
Read Also :
- कराडमधील मोर्चा अंगलट; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा दाखल
- “आत म्हणतात तुमचा देशमुख करून टाकू, बाहेर म्हणतात भुजबळ करून टाकू; हीच तर भाजपची गुंडवृत्ती”
- रिक्त पदं भरण्यास मान्यता देण्यात आलीये; अजित पवारांची सभागृहात महत्वाची माहिती
- अधिवेशनातील ‘त्या’ कारवाईचे पुण्यात पडसाद; मोगलाई सरकारचा भाजपकडून तीव्र निषेध
- “ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आली आहे”- देवेंद्र फडणवीस