प्रतिनिधी: अभिषेक नांगरे
मुंबई: काल महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघणारी घटना पावसाळी अधिवेशनात घडली. पावसाळी अधिवेशन हे विविध कारणांनी वादळी ठरणार होते हे निश्चित होते मात्र एवढे वादळी ठरेल अशी साधी भनकही कोणाला नव्हती. मंत्री छगन भुजबळ यांनी इम्पिरियल डाटा केंद्राने त्वरित द्यावा अशी मागणी केल्याचा ठराव मांडला होता आणि ती ठराव तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभेत मंजूर केला. यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि सभागृह तहकूब करण्याचे आदेश दिले गेले.
‘त्या’ १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयात जायचे असेल जाऊ द्या, निलंबन रद्द होणार नाही”
भारतीय जनता पक्षाच्या वतीने काल अति आत्मविश्वासकारक कामे सुरूच होती. अशातच सभागृहाचे कामकाज झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव हे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात गेले. त्यावेळी दोघांमध्ये काहीतरी चर्चा सुरु होती. अशातच तिथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे संतापलेले होते आणि त्यांच्या रागाचा पारा देखील चांगलाच चढलेला दिसत होता. देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांच्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन, संजय कुंटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग आळवणी, हरीश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया हे आमदारही दाखल झाले.
मोठी बातमी: भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; पत्रकारांनाही हाकालले, कॅमेरे हिसकावून घेतले
फडणवीसांना आलेला राग पाहून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा चेव वाढला आणि होत्याचे नव्हते झाले. लोगोलाग मंत्री गुलाबराव पाटील, आमदार दिलीप बनकर, सुहास कांदे हे देखील आले. दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये खडाजंगी सुरु झाली. आता गेलेल्यांनि दालनाचे दार आतून बंद केले. वाद वाढत गेला आणि आवाजही चढत गेला. त्याचवेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील बाहेरून दार ठोठावण्यास सुरुवात करू लागले आणि पाच ते सात मिनिटांच्या नंतर दार उघडले गेले.
सात वर्षे केंद्रात भाजपची सत्ता, जनगणना सदोष होती तर त्यात दुरुस्ती का केली नाही?
आतमध्ये चुकीचे घडले आहे हे ऍड. आशिष शेलार यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची माफी मागितली. भास्कर जाधव यांनी आधी लाथा मारता आणि नंतर माफी का मागता असे सुनावले. त्यानंतर मंत्री नवाब मलिक हे तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले. आपण आता गप्प बसलो तर ही मारामारी रस्त्यांवर सुरु होईल आणि या आमदारांचे तातडीने निलंबन केले पाहिजे असा सूर त्यांनी लावून धरला.
अधिवेशनातील ‘त्या’ कारवाईचे पुण्यात पडसाद; मोगलाई सरकारचा भाजपकडून तीव्र निषेध
संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी लागलीच ऍक्शन मोड ऑन केला आणि पुढील कायदेशीर सूत्र हलवण्यास सुरुवात केली. अनिल परब स्वतः सचिव राजेंद्र भागवत यांच्या दालनात गेले. गोंधळ करणाऱ्या सर्व आमदारांची यादी तयार करण्यात आली आणि ती घेऊन परब धावतच मुख्यमंत्र्यांकडे गेले. अध्यक्षांच्या दालनात काय घडले हे सभागृहात सांगण्याची परंपरा नाही मात्र यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही सर्व घटना रेकॉर्डवर आणण्याचा सल्ला दिला.
अधिवेशनातील ‘त्या’ कारवाईचे पुण्यात पडसाद; मोगलाई सरकारचा भाजपकडून तीव्र निषेध
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांचे पुन्हा सभागृहात आगमन झाले आणि अध्यक्षांनी लागलीच सर्व आपबिती सांगितली. असा प्रकार हा विधानसभेत पहिल्यांदाच घडला आणि भारतीय जनता पक्षाची रणनीती संपूर्णतः फसली. फडणवीस यांनी देखील कबुली दिली आणि एक दोन लोकांचे शब्द चांगले नव्हते. त्याब्ब्दल आम्ही माफीही मागितली आहे असे सांगून सर्व प्रकार मान्य केला. दरवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आक्रमक होतात आणि आपण बॅकफूटवर जातो असा सूर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावला.
फोन टॅपिंग प्रकरणावरून नाना पटोले आक्रमक, गृहमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची घोषणा
कुठेतरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे आता पूर्णतः एकत्र आले हे या घटनेवरून सिद्ध झाले. भारतीय जनता पक्ष कुठेतरी टप्प्यात सापडला आणि महाविकास आघाडीने करेक्ट कार्यक्रम करत हम किसी से कम नही हे दाखवून दिले. भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला पावसाळी अधिवेशनात कोंडीत धरणार होता हे नक्की होते मात्र नो बॉल वर सिक्स मारत १२ आमदारांचे थेट निलंबन करून १२ आमदारांचा बदला महाविकास आघाडीने घेतला हे मात्र नक्की.
हे पण वाचा,
आमदार रवी राणांनी राजदंड पळवला; मार्शलच्या सहाय्याने राणांची सभागृहातून हकालपट्टी
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा देशपातळीवर सन्मान