मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक होत, पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केलं. तसेच, यावेळी विधानसभेच्या आवारात प्रतिविधानसभा भरवून, त्यांनी ठाकरे सरकारच्या मनमानी कारभाराविरुद्ध निषेध जाहीर केला आणि अधिवेशनावर बहिष्कार घातला. मात्र, सत्ताधारी पक्षांतील आमदारांनी, यावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली आणि अध्यक्षांच्या आदेशाने भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई करण्यात आली.
“आत म्हणतात तुमचा देशमुख करून टाकू, बाहेर म्हणतात भुजबळ करून टाकू; हीच तर भाजपची गुंडवृत्ती”
यावेळी, पत्रकारांना तेथून मार्शलद्वारे हाकलण्यात आलं. त्यांचे कॅमेरे ओढले गेले. भाजप नेत्यांनी घेतलेले माईक, स्पीकर ताब्यात घेण्यात आले. तसेच, त्यांना विधानसभेच्या आवारातून हाकलण्यात आले. यानंतर भाजप नेत्यांनी आपला मोर्चा पत्रकारांच्या दालनाकडे वळवला आणि तिथे माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी, ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
रिक्त पदं भरण्यास मान्यता देण्यात आलीये; अजित पवारांची सभागृहात महत्वाची माहिती
“राज्यात ठाकरे सरकारने आणीबाणी लावली आहे. आमच्याकडून सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येत आहे आणि म्हणूनच आता सरकारने ही दडपशाही सुरु केली आहे. आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून, आमच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. माध्यमांवर मार्शल आणून मुस्काटदाबी करण्यात येत आहे. सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटं बोलणं सुरु आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
“ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आली आहे”- देवेंद्र फडणवीस
तसेच, प्रत्येक बाबतीत केंद्राकडे बोट दाखवायचं, “शेतकऱ्यांना मदत- केंद्र सरकार करणार, कर्जमाफी- केंद्र सरकार देणार, चक्रीवादळग्रस्तांना मदत, पीक विमा, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण, मेट्रोचं काम, रेमडेसिवीर, पीपीई किट, ऑक्सिजनचा पुरवठा, लसीकरण असं करत सगळं काही जर केंद्र सरकारनेच करायचे असेल आणि तुम्ही केंद्रावरच ढकलणार असाल, तर तुम्हाला तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय? की या सरकारला फक्त वसुल्या करायच्या आहेत?”, अशी जोरदार टीका करत त्यांनी, “अशा प्रकारचे राज्यकर्तेच पाहिले नाहीत, ज्यांना आत्मविश्वास नाही,” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारला लगावला आहे.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांच्या वन खात्यात बदल्यांसाठी रेट कार्डवर काम सुरु; फडणवीसांनी केला गौप्यस्फोट
- भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार?
- “…नाहीतर या सरकारने मला क्लिन चिट द्यावी”, प्रताप सरनाईकांची सभागृहात मोठी मागणी
- कराडमधील मोर्चा अंगलट; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा दाखल