पंढरपूर : देशातील विरोधी पक्ष विस्कटलेला स्वरूपात आहे. देशहितासाठी आता सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे.असे परखड मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे. पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी सध्याच्या सरकारच्या अनेक धोरणांविषयी आपले मत व्यक्त केले.
देशात सध्या जे काही वातावरण तयार झाले आहे. त्यावरून देशातील सामाजिक परिस्थिती ही मृतावस्थेकडे चालली असून देशात बेबंदशाही सुरू आहे, अशी टीका शिंदे यांनी आज पंढरपुरात केली.शिंदे यांनी येथील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक, भागवताचार्य वा. ना. उत्पात, कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरक्षण, हाथरसची घटना या वरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. शिंदे म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरत आहे. सामाजिक शांतता बिघडत चाललेली आहे. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. अशा सगळ्या घटनेमुळे देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सोशल मीडियातून काही फेक अकाउंट बनवून मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली आहे. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका बसला असून त्याचा वापर विचार करून करावा,असा सल्ला शिंदे यांनी दिला आहे.
Read Also
भाजपच्या काळात सर्वाधिक बलात्कार : रूपाली चाकणकरhttps://t.co/TY74I8EZDE#RupaliChakankar #NCP @ChakankarSpeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 10, 2020