मुंबई : नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याची जोरदार चर्चा होती. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का ? असा देखील सवाल विचारला जात होता मात्र आता स्वतः खासदार संजय राऊत यांनी या भेटीबाबत पहिल्यांदाच उघड भाष्य केले आहे.
होय आम्ही भेटलो,राज्यातील दोन नेत्यांनी आपापसात भेटू नये असा काही कायदा आहे. तसेच मी घेतलेल्या सर्व मुलाखती या अनकटच असतात त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत देखील अनकट असेल असे संजय राऊत म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी हे भाष्य केले आहे. ही मुलाखत नेमकी कधी होणार असे पत्रकारानडून विचारले गेले असता त्यासाठीची तारीख ठरवण्यासाठी आम्ही पुन्हा भेटणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांची देखील मुलाखत घेतली आहे आणि माझ्या सर्व मुलाखती अनकट असतात असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील मुलाखतीबाबत विचारले असल्याचे देखील संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
Read Also
राम मंदिरामध्ये मोदींच काहीही योगदान नाही,सार श्रेय राजीव गांधींचं : सुब्रमण्यम स्वामीhttps://t.co/zFDRKTNvMw#RamMandir #PMModi #BJP #SubramanianSwamy
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 29, 2020