मुंबई : पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अरुण लाड यांना तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत, तर भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली आहेत. लाड यांनी या निवडणुकीत 48 हजार 824 मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. लाड यांनी 1 लाख 14 हजार 137 मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला आहे.
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात कदम – लाड गटाचं कधीच पटलं नाही. मग ना. विश्वजीत कदम हे अरुण अण्णांना आमदार करण्यात आघाडीवर कसे? त्याचं उत्तर २०१९ विधानसभा निवडणुकीत दडलं आहे. या निवडणुकीत कदम-लाड गटाचं वैरत्व संपुष्टात आले. यामागं महाविकास आघाडीचे धुरंधर नेते शरद पवार यांचा हात आहे. परस्पर विरोधी बाजूला असणाऱ्या मागील काळातील हेवेदेवे विसरून लाड गटाने २०१९ विधानसभा निवडणुकीत डॉ. विश्वजीत कदम यांच्या पाठीमागे संपूर्ण ताकत लावली होती. कदम यांच्या विक्रमी विजयात लाड गट पाठीशी होता. लाड गटाने केलेल्या मदतीची परतफेड करण्याची संधी ना. डॉ. विश्वजीत कदम यांना पदवीधर निवडणुकीने दिली.
पुणे पदवीधर मतदारसंघ गेल्या दोन दशकापासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कडून अरुण अण्णा लाड उमेदवार दिली होती. ही निवडणूक तशी राष्ट्रवादीला सोपी नव्हती. कसल्याहि परिस्थिती मध्ये पुणे पदवीधर मतदार संघ जिंका
असे बोलत शरद पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
निवडणूक सर करायची झाल्यास ना. डॉ. विश्वजीत कदम यांचं मोल राष्ट्रवादीनं ओळखलं होतं. महाविकास आघाडीची उमेदवारी अरुण अण्णा करीत होते. यामुळे आणि मागील विधानसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याची जाण ठेवत ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी आपली पूर्ण ताकत पणाला लावत आपली यंत्रणा कामाला लावली.
विश्वजीत कदम युवक काँग्रेसचे दोन वेळा प्रदेशाध्यक्ष होते. या काळात त्यांनी युवकांचं संघटन मजबूत केलं होतं. त्यांच्या युवक संघटनेच्या कार्यकाळातील कार्यकर्ते त्यांचा शब्द प्रमाण मानून काम करतात. या निवडणुकीत त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील युवक काँग्रेसची फौज प्रचारात उतरवली. युवक आघाडीने या निवडणुकीत नेटाने प्रचार केला.विश्वजीत कदम यांनी युवक काँग्रेसची फळी केवळ पुणे मतदारसंघात उतरवली नाही तर राज्यातील अन्य मतदारसंघात सक्रिय केली. भारती परिवारातील हजारो हातांनी अरुण अण्णांना ‘हात’ दिला. त्यांच्या विजयासाठी भारती परिवार निष्ठेने झटला.
राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील.
Read Also :
बॉक्सिंग महासंघ निवडणुकीच्या रिंगणात आशीष शेलार?
‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं’, मंत्री सतेज पाटलांचा टोला
नितीन गडकरींची तरतूद आणि श्रेयवादाच्या लढाईत कोल्हे, लांडगे, आढळराव पाटलांमध्ये चढाओढ
“लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक आहे का?”; निलेश राणे यांचा अजित पवारांवर हल्ला
येत्या 1 मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास करणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा