जालना : सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, यामागणीसाठी आज जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी समाजाची सभा होत आहे. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांकडून अंबडमध्ये आरक्षण बचाव एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर आणि पंकजा मुंडे हे एल्गार परिषदेचे नेतृत्व करणार आहेत.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नसतील तर…,” अपक्ष आमदार बच्चू कडू यांचं मोठं विधान
जालन्यातील ओबीसी एल्गार सभेसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या सभेसाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. आजच्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेसाठी बाराशे पोलीस ३ एसआरपीएफ तुडक्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील विविध भागांमध्ये सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शहराबाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीय.
हेही वाचा…वडेट्टीवार अन् जरांगे पाटलांच्यामध्ये दिवाळीच्या आधी फटाके फुटले, आरोप-प्रत्यारोपांच्या रंगल्या फैऱ्या
दरम्यान, ओबीसी समाजाकडून आरक्षण बचाव एल्गार सभेसाठी ओबीसी बांधवांसाठी ३० क्विंटल खिचडी शिवजण्यात आलीय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो बांधवांसाठी खिचडी देण्यात येत आहे. ३० क्विंटल खिचडी आणि जवळपास ट्रकभर पाणी पाऊसची व्यवस्थी करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठरलं तर मग..! माधुरी दिक्षीत लोकसभा निवडणुक लढवणार? भाजपमध्ये प्रवेश करणार ?
हेही वाचा…बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटात राडा, ठाकरे अन् शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
हेही वाचा…“फडणवीस साहेब साचेबंद बोलणं बंद करा, तेच चेहरे, तेच मोहरे..,” सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आंदोलनाची धग कायम, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा कार्यक्रम मराठा तरूणांनी उधळून लावला”
हेही वाचा…अजित पवारांची शरद पवारांसोबत भेट, अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय चर्चांना उधाण