मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गुरूवारी मोठा राडा झाला. शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आल्याने आता त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहे. स्मृतीस्थळावर शिंदे गटाचे कार्यकर्ते दोन तास का थांबले ? असा सवाल केला जात आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदे गटावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…ससून रूग्णालयात १७ लाख रूपये ललित पाटील नेमका कुणाला द्यायचा? ड्रग्जप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
शिवतीर्थावरील आदरणीय शिवसेना प्रमुखांचे स्मृती स्थळ पवित्र आहे. त्याचे पावित्र्य राखायाला हवे. छत्रपती संभाजी राजे यांच्या स्मृतिस्थळावर औरंग्याची पिलावळ जाणे मान्य नाही. त्या प्रमाणे शिवतीर्थावर स्मृतीस्थळी अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नाही. पावित्र्य भंग होईल. शिवसैनिक एका निष्ठेने भिडणाराच असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
महेश काळेंचा स्वरसाज,लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे ‘सुर संध्या’ने बहरली दिवाळी
दरम्यान, ज्यांनी आपले स्वातंत्र्य, पत्र भाजपच्या दावणीला नेऊन बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांना हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरे फक्त त्यांचेच आहेत. जे त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. शिवसेनेचे बोट धरून उभ्या महाराष्ट्रात मोठ्या झालेल्या भाजपची धुणी भांडी करणे, आठवड्यातून किमान दोनदा दिल्लीला जाऊन मुजरा झोडणे हे ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाटत असतील ते मुर्खांच्या नंदनवनात फिरताहेत. असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीस साहेब साचेबंद बोलणं बंद करा, तेच चेहरे, तेच मोहरे..,” सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आंदोलनाची धग कायम, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा कार्यक्रम मराठा तरूणांनी उधळून लावला”
हेही वाचा…अजित पवारांची शरद पवारांसोबत भेट, अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नसतील तर…,” अपक्ष आमदार बच्चू कडू यांचं मोठं विधान
हेही वाचा…वडेट्टीवार अन् जरांगे पाटलांच्यामध्ये दिवाळीच्या आधी फटाके फुटले, आरोप-प्रत्यारोपांच्या रंगल्या फैऱ्या