मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेवरुन सामनामधून अग्रलेख लिहित केंद्र सरकावर टीका केली होती. आज राऊतांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेत्या चित्रा वाघ राऊतांवर जोरदार बरसल्या. ‘सोनिया सेनेचे प्रवक्ते ‘असा उल्लेख करत ‘राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत आपण मुंबईची चिंता करा’, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
राज्यात ईडी विरोधी पक्षाशी सल्लामसलत करुन काम करतेय; जयंत पाटील म्हणतात…
सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत ह्यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात. अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो… हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे.
सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते
संजय जी राऊत ह्यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जी आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे (१/२) @rautsanjay61 pic.twitter.com/tbGdDYfev6— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 18, 2021
एमएच १२ चे बडे नेते राष्ट्रवादीत; २०२२ ला महापालिका निवडणुकीत घड्याळ भाजपचे १२ वाजवणार?
तरी आपणास असं खरेच वाटत असेल तर आपल्या राज्याचे सन्माननीय यांची सुरक्षा काढून घ्यावी आणि स्वतःपासून आदर्श घालून द्यावा असा प्रयोग करायला काय हरकत आहे?, गेली दीड वर्ष मा.मुख्यमंत्रीजी हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच व्यतित करतात… ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही, असा टोला चित्रा वाघ यांना लगावलाय.
मोदींच्या सभेत काळे मास्क खेचून काढले, कलियुग म्हणतात ते हेच का?
तसेही आपले राष्ट्रीय पातळीवरील अस्तित्व बिहार निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे जनतेपुढे आलेले आहे. यामुळे आपल्याला मला सांगायचंय संजयजी की राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत. आपण आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे. कारण लोकल बंद झाल्यामुळे जनतेची दैनंदिनी बिघडली आहे… त्यांना हेलपाटा मारावा लागतोय.. जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते.. या समस्यांवर आपल्या ज्ञानज्योतीचा प्रकाश पाडावा, असे खोचक टोले टोमणे चित्रा वाघ यांनी राऊतांना लागवेल आहेत.
Read Also :
- तुम्हाला मिळालेली सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका; शिवसेनाने काढली खासदार अमोल कोल्हे यांची खरडपट्टी
- कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल, “हे’ आहे खरे कारण
- एमएच १२ चे बडे नेते राष्ट्रवादीत; २०२२ ला महापालिका निवडणुकीत घड्याळ भाजपचे १२ वाजवणार?
- मोदींच्या सभेत काळे मास्क खेचून काढले, कलियुग म्हणतात ते हेच का?
- ‘मिस्टर इंडिया’ झालेल्या झोटिंग समितीच्या अहवालावर, अजित पवारांचा मोठा खुलासा