मुंबई : पुण्याच्या शिरूर लोकसभा मतदार संघाचे बळे बळे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत आणि आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवले आहे. अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत ? अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली आहे बहुतेक, अशी खरडपट्टी शिवसेनेने राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची काढली आहे.
शिरुरचे आजी-माजी खासदार आमने-सामने; रस्ता उद्घाटनाचे श्रेय लाटण्यासाठी आक्रमक!
तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावन्त कधी कधी स्मरणशक्ती विसरतात तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धवसाहेबांच्या मेहेरबानी मुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले, अंगा पेक्षा पोंगा जास्त झाला की होते असे !!, अहो कोल्हे ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरू नका, उपमुख्यमंत्री अजीत दादा पवार आणि दस्तूर खुद्द शरद पवार साहेब सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. तुम्ही कशाला फार विचार करता, तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण, दिग्दर्क्षकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका असा सल्ला देत शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी खासदार अमोल कोल्हे यांची खरडपट्टी काढली.
काय म्हणाले होते अमोल कोल्हे?
शरद पवारांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असे वक्तव्य करताना, लॉकडाउनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळतंय. वयस्कर नेत्यांनं असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं.असे अमोल कोल्हे शिरूर येथे बोलले त्या बाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हे यांची खरडपट्टी काढली. कलाकार आहात कलाकारच राहा उगाच राजकारणी बनण्याचे नाटक करू नका असा सल्लाही त्यांनी शेवटी खासदार अमोल कोल्हे याना दिला.
काय आहे नेमके प्रकरण?
पुणे – नाशिक महामार्गावरील खेड बायपास व नारायणगाव बायपास या रस्त्याचे काम पुर्ण झाले नाही, असे असताना राष्ट्रवादीच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी (दि. १७) सकाळी खेड व नारायणगाव बाह्यवळण कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले होते. तसे संदेश समाज माध्यमांवरआले. त्यात घड्याळ, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार अमोल कोल्हे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, आमदार अतुल बेनके यांचे छायाचित्र होते. मात्र, माजी खासदार आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून हे उद्घाटन शुक्रवारीच (दि १६) मोठा गाजावाजा करीत उरकून घेतले. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, खासदार डॉ. अमोल कोल्हे याना लक्ष केले. यावेळी अमोल कोल्हे यांनी दुसऱ्या दिवशी अधिकृत उद्धाटन करत शिवसेनेवर टिकेची झोड उठवली होती.
Read Also :
- कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल, “हे’ आहे खरे कारण
- एमएच १२ चे बडे नेते राष्ट्रवादीत; २०२२ ला महापालिका निवडणुकीत घड्याळ भाजपचे १२ वाजवणार?
- मोदींच्या सभेत काळे मास्क खेचून काढले, कलियुग म्हणतात ते हेच का?
- ‘मिस्टर इंडिया’ झालेल्या झोटिंग समितीच्या अहवालावर, अजित पवारांचा मोठा खुलासा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबतं; राजकीय भूकंप होण्याची शक्यता?