शिरूर : पुणे – नाशिक महामार्गावरील खेड बायपास व नारायणगाव बायपास या रस्त्याचे उद्घाटन श्रेय लाण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमने सामने आले आहे. एकीकडे शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल (शुक्रवारी) बायपास रस्त्यांचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तर दुसरीकडे आज (शनिवारी) राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुन्हा नव्याने उद्धाटन केले. त्यामुळे आजी माजी खासदाराच्या श्रेयवादाच्या लढाईत बायपास रस्त्याला राजकीय गालबोट लागले आहे.
पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड संघर्ष, महाविकास आघडीवर होणार याचा परिणाम?
खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम पुर्ण झाले नाही, असे असताना राष्ट्रवादीच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी (दि. १७) सकाळी खेड व नारायणगाव बाह्यवळण कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले होते. तसे संदेश समाज माध्यमांवरआले. त्यात घड्याळ, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार अमोल कोल्हे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, आमदार अतुल बेनके यांचे छायाचित्र होते. मात्र, माजी खासदार आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून हे उद्घाटन शुक्रवारीच (दि १६) मोठा गाजावाजा करीत उरकून घेतले. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, खासदार डॉ. अमोल कोल्हे याना लक्ष केले.
मोदींच्या सभेत काळे मास्क खेचून काढले, कलियुग म्हणतात ते हेच का?
आढळराव म्हणाले, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदार संघात गेल्या दोन वर्षातील ठळक कामे दाखवावीत. खेड-सिन्नर चौपदरीकरण काम त्यातही प्रलंबित होत गेलेले खेड घाट बाह्यवळण, नारायणगाव बाह्यवळणाच्या कामांसाठी आम्ही प्रयत्न आणि पाठपुरावा केला. यामुळे या मार्गाचे उद्घाटन करण्याचा अधिकार आमचा आहे. दोन वर्षात रेल्वेचा प्रकल्प मार्गी लागतो का? दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय लाटू नये असा टोलाही आढळराव पाटील यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांना लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबतं; राजकीय भूकंप होण्याची शक्यता?
दुसरीकडे विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ठरल्या प्रमाणे आज (शनिवारी) पुन्हा नव्याने उद्धाटन केले. अमोल कोल्हे म्हणाले, या कामाचे खरे श्रेय हे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आहे. मी फक्त कर्तव्य म्हणून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खेडघाटाचे लोकार्पण या शेतकऱ्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. खेड बायपास व नारायणगाव बायपासचे अधिकृत उद्घाटने केल्यानंतर बोलताना राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “निवडणुकीनंतर पद गेल्यानंतरची ही अस्वस्थता राज्यात अनेकांना आहे. दुर्दैवाने शिरुरमध्ये सुद्धा आढळराव बैचेन आहेत. त्यातूनच त्यांनी काल हे उद्घाटन केले आहे. इतक्या वयस्कर व्यक्तीने असे वागणं बरोबर नाही. दोन्ही बायपास कामाचा पाठपुरावा आपणच केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आमच्याही मनात आदर आहे. ते मुख्यमंत्रिपदावर आहेत कारण आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे, असे त्यांनी सांगितले.”
कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल, “हे’ आहे खरे कारण
शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे नाशिक रस्त्यावरील खेड घाट व नारायणगाव बायपास या रस्त्याचे काम शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील खासदार असताना मंजूर झाले. नंतरच्या कालावधीत काम बंद पडले होते. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन आढळराव पाटलांनी हे काम पुन्हा चालू केले. काम पूर्णत्वास येत असताना मागील दीड वर्षात खासदार अमोल कोल्हे यांनी मतदार संघात एकही ठोस काम न करता या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पायाभूत सर्व्हे व इतर सर्व अडथळे पार करण्यासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आग्रही भूमिका घेतली होती. रेल्वे काय १ वर्षात आली काय? मात्र कोल्हे रेल्वेचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभुल करत आहे. खेड व नारायणगाव या बाह्यवळण रस्त्याचा मी पाठपुरावा केला आहे. म्हणून शिवसेनेच्या वतीने हा रस्ता खुल्ला केला आहे, असे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी सांगितले.
Read Also :
- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युती? फडणवीसांचे सूचक विधान
- राज्यात ईडी विरोधी पक्षाशी सल्लामसलत करुन काम करतेय; जयंत पाटील म्हणतात…
- एमएच १२ चे बडे नेते राष्ट्रवादीत; २०२२ ला महापालिका निवडणुकीत घड्याळ भाजपचे १२ वाजवणार?
- मोदींच्या सभेत काळे मास्क खेचून काढले, कलियुग म्हणतात ते हेच का?
- ‘मिस्टर इंडिया’ झालेल्या झोटिंग समितीच्या अहवालावर, अजित पवारांचा मोठा खुलासा