नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर आहेत, दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील ३ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत.
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला पुन्हा गर्दी; पक्षाची मोर्चेबांधणी सर्वसामान्यांच्या मुळावर उठलीये का?
या पार्श्वभूमीवर काल, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युती होणार का? असे त्यांना विचारले असता, “परप्रांतियांच्या बद्दलची भूमिका बदलत नाही, तोवर हे शक्य नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेले नेतृत्व आहे. परंतु, एकट्या मनसेच्या जिवावर सत्ता येणार नाही. मात्र, ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत,” असं वक्तव्य केलं आहे.
कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल, “हे’ आहे खरे कारण
या पार्श्वभूमीवर आज दिल्लीहून, राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नागपूर विमानतळावर सकाळी दाखल झाले. यावेळी त्यांना, मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल करण्यात आला.
ईडी, सीबीआयच्या रडारवर कोण? का म्हणाले चंद्रकांत पाटील, रात्रीत कुणालाही अटक होऊ शकते…वाचा सविस्तर
यावर त्यांनी, “योग्यवेळी योग्य निर्णय होईल, अजून त्याला वेळ आहे, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता,” असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
Read Also :
- राज्यात ईडी विरोधी पक्षाशी सल्लामसलत करुन काम करतेय; जयंत पाटील म्हणतात…
- एमएच १२ चे बडे नेते राष्ट्रवादीत; २०२२ ला महापालिका निवडणुकीत घड्याळ भाजपचे १२ वाजवणार?
- मोदींच्या सभेत काळे मास्क खेचून काढले, कलियुग म्हणतात ते हेच का?
- ‘मिस्टर इंडिया’ झालेल्या झोटिंग समितीच्या अहवालावर, अजित पवारांचा मोठा खुलासा
- काँग्रेसच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीची विदर्भात दुय्यम भूमिका, मात्र आता हे खपवून घेणार नाही