सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा गर्दी झाल्याचं समोर आलं आहे. जयंत पाटील आज, शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं समोर आलं आहे. यावेळी कोरोना नियमांचं पायमल्ली झाल्याचेही दिसून आलं. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर काही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसला नाही. याआधी पुण्यातील कार्यलाय उद्घाटनावेळी शेकडो लोकांनी गर्दी केली होती. दरम्यान, दुसरी लाट अजुन संपलेली नसताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना अजित पवार विकेंण्ड लॉकडाऊनवर ठाम आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील दिग्गज नेते मात्र आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी संचारबंदीचे नियम पायंदळी तुडवत असताना चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षाची आगामी महापालिका निवडुकीसाठी चाललेली मोर्चेबांधणी सर्वसामान्याच्या जीवावर उठली आहे का?, जयंत पाटलांवर कारवाई होणार का?, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
नाना पटोलेंच्या बोलण्याने आम्हाला काही फरक पडत नाही; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे रोखठोक विधान
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गर्दी टाळण्याचं आवाहन करत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र कोरोना नियम मोडत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांत होणाऱ्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त करून राष्ट्रीय धोरण ठरवण्याची विनंती केली होती. अशातच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मात्र कोरोना नियमांना हरताळ फासल्याचं चित्रं आज सोलापुरात दिसलं.
दस मे बस! “पुणेकर” म्हणतात आता बस्स!
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापुरात एमआयएमच्या माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या मुलासह सहा नगरसेवकांच्या नातेवाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. अनेकांच्या चेहऱ्यांवर मास्कही नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाला. गर्दी जमवल्यामुळे जयंत पाटलांवर विरोधकांनी टिकेची झोड उठवली असताना “जयंत पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कार्यकर्त्यांना गर्दी कमी करण्यास सांगितलं. जितकी परवानगी आहे तितकेच लोक कार्यक्रमाला हजर राहा, इतरांनी बाहेर थांबा, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, कार्यर्त्यांनी एकही ऐकलं नाही”, असे कारण देत सर्रासपणे हात वर केले आहेत.
मोठी उलथापालथ: नाशिक महापालिकेत पुन्हा एकदा मनसे राज येणार? ठाकरेंच्या भुमिकेकडे लक्ष…
पुण्यातील कार्यालय उद्धाटनातील गर्दी प्रकरणी जगतापांना अटक
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नुतन मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कोरोनाच्या संसर्गाबाबतचे नियम पायदळी तुडवित मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सहा जणांना सोमवारी अटक करण्यात आली. दोन तासानंतर त्यांना जामीन मंजुर झाल्यानंतर त्यांची सुटका झाली.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चिट? गृहमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान
गर्दी झाल्यामुळे नाराजी व्यक्त करतानाच अजित पवार यांनी त्याबद्दल दिलगीरीही व्यक्त केली होती. “विकेंडला बाहेर जाणाऱ्या पुणेकरांना क्वारंटाईन करू’ असे सांगणारे पवार हे या प्रकरणी कडक भुमिका घेणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
सोलापूरातील गर्दी प्रकरणी कारवाई होणार?
राज्यातील अद्यापही पुर्ण निर्बध उठवण्यात आले नाहीत. त्यातच शनिवार रविवार विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. शिवाय सर्वसामान्य नागरिकांनी नियम तोडलेच तर पोलिस प्रशासनाकडून कठोर कार्यवाई करण्यात येत आहे. हजारोंचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना भरावा लागत आहे.
“प्रविण तू तर चॅम्पियन आहेसच तुझे आई-वडिलही चॅम्पियन आहेत”, नरेंद्र मोदींकडून कौतुक
हे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे, अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादीला नियमांचे भाव उरले नाही का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सर्वसामान्यांच्या जीवावर उठली आहे का?, अशा गर्दीमुळे तिसरी लाट सोड दुसरीच लाट मोठ्या प्रमाणात फोफावणार नाही का?, त्यातच तिसरी लाट अलीच तर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा किती मोठ्या प्रमाणात फटका बसेल, याचे गांभीर्य राहिले नाही का?, अजून किती निष्पाप बळी घेणार आहेत, असे अनेक प्रश्न आता नागरिकांना पडू लागले आहेत.
Read Also :
- ईडी, सीबीआयच्या रडारवर कोण? का म्हणाले चंद्रकांत पाटील, रात्रीत कुणालाही अटक होऊ शकते…वाचा सविस्तर
- ‘मिस्टर इंडिया’ झालेल्या झोटिंग समितीच्या अहवालावर, अजित पवारांचा मोठा खुलासा
- काँग्रेसच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीची विदर्भात दुय्यम भूमिका, मात्र आता हे खपवून घेणार नाही
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबतं; राजकीय भूकंप होण्याची शक्यता?
- मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराकडून हरताळ!; मलकापूरमध्ये काँग्रेस आमदारावर गुन्हा दाखल