मुंबई : आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून, राज्याच्या राजकारणात सातत्याने काही ना काही जबरदस्त घडामोडी घडतच आहेत. हळूहळू या सरकारमधल्या अंतर्गत कुरबुरी आता बाहेर येऊ लागल्या असून, एकमेकांच्या पायात पाय घालून आपल्याच सरकारच्या पायावर, हे मंत्री दगड मारून घ्यायला लागले आहेत. मंत्र्यांचे जुने, नवे भ्रष्टाचार बाहेर येऊ लागले आहेत, नाना पटोले आणि शिवसेनेचा जुना संघर्ष बाहेर येत असून, त्यांच्या स्वबळाच्या घोषणेने ठाकरे सरकारमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
नाना पटोलेंच्या बोलण्याने आम्हाला काही फरक पडत नाही; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे रोखठोक विधान
यातच आता शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड हा संघर्ष पुन्हा एकदा बघायला मिळतोय. याआधी देखील शिवसेना मंत्री अनिल परब हे गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार तत्कालीन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. यांनतर आता शिवसेना नेते, आमदार, मंत्री यांनी जितेंद्र आव्हाडांच्या कार्यशैली आणि कार्यपद्धतीबाबत नाराज असून, त्यांनी आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे, असे समजते आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी देखील आव्हाडांची तक्रार ‘वर्षा’ वर केली होती.
मोठी उलथापालथ: नाशिक महापालिकेत पुन्हा एकदा मनसे राज येणार? ठाकरेंच्या भुमिकेकडे लक्ष…
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हे सगळे घडत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत अधिक बोलताना, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “आव्हाडांबद्दल सेनेच्या आमदारांनी खरंच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल, तर चांगलंच आहे, कारण तक्रार ही दुरुस्तीसाठीच असते. ३ पक्ष असल्याने या छोट्या-मोठ्या गोष्टी घडत असतात.”
किरीट सोमैय्यांचे महाविकास आघाडीवर गंभीर आरोप, महत्वाचे मंत्री अडचणीत येण्याची शक्यता
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर, मुख्यमंत्र्यांनी टाटा रुग्णालयाला दिलेल्या सदनिकांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का बसला होता. मात्र, “याबाबत काही गैरसमज झाले असावेत. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,” असं म्हणत निर्णयाला स्थगिती मिळाल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्यानंतर २४ तासांत मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
फडणवीस-पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर, रामदास आठवलेंचा धक्कादायक खुलासा!
यावेळी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी आमदार विनोद घोसाळकर, राहुल शेवाळे, सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आता या तक्रारीची दखल मुख्यमंत्री घेतात का? घेतली तर ते काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे आहे. त्यामुळे, या सरकारची गाडी महामार्गावर धावण्याऐवजी, ओबडधोबड असलेल्या खाचखळग्यांच्या रस्त्यावरून धावत आहे आणि याचा परिणाम आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि विधानसभेच्या पाहायला मिळणार, हे नक्की आहे.
Read Also :
- दस मे बस! “पुणेकर” म्हणतात आता बस्स!
- राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; मनसे आणि भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण
- मेट्रोविरोधात आंदोलन, भाजप नेते अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात
- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चिट? गृहमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान
- स्वबळावर लढण्याबाबतीत काँग्रेसमध्ये दोन गट? वडेट्टीवारांनी स्पष्ट केली आपली भूमिका