नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्यास त्यांच्यात युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चिट? गृहमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान
राज ठाकरे कालच नाशिकच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीचा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राज ठाकरे नाशिकमध्ये आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
हे पण वाचा: पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना क्लिन चीट; राठोड यांचं होणार पुनर्वसन?
ती भूमिका सोडली तर युती शक्य
दरम्यान, पाटील यांनी कालच मनसेशी युती करण्याबाबत मोठं विधान केलं होतं. मनसे परप्रांतियांच्या बद्दलची भूमिका बदलत नाही तो पर्यंत हे शक्य नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या जिवावर सत्ता येणार नाही. आमचा खूप जुना परिचय आहे. योग आला, तर त्यांना भेटेल. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, असं पाटील म्हणाले होते.
हे पण वाचा: “प्रविण तू तर चॅम्पियन आहेसच तुझे आई-वडिलही चॅम्पियन आहेत”, नरेंद्र मोदींकडून कौतुक
‘ते‘ भाजपसोबत येतील असे वाटत नाही
शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, “आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत नसलो, तरी आमचे त्यांच्याशी वैरदेखील नाही. आम्ही जनकल्यानासाठी आंदोलने करतो. तुम्ही एकत्रित निवडणूक लढवता, मुख्यमंत्री पदासाठी वेगळे सरकार चालते, वेगळ्या विचारांच सरकार चालते. परिस्थितीप्रमाणे निर्णय बदलत असतात. मात्र, ते भाजपसोबत येतील असे वाटत नाही,” असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.