अलिबाग : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार अशी भूमिका जाहीर केली आणि सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतल्या शिवसेना – राष्ट्रवादीचे धाबे दणाणले. ठाकरे सरकार मध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना परत उधाण आले, तसेच त्यामुळे भाजपा आणि शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चा देखील झडू लागल्या.
फडणवीस-पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर, रामदास आठवलेंचा धक्कादायक खुलासा!
या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “विधानसभेच्या निवडणुकांना ३ वर्षांचा कालावधी असून, त्यामुळे काँग्रेस किंवा आमचे इतर घटक-मित्रपक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार; की आघाडी करून हा विषय आत्ताच फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. अलिबाग दौऱ्यावर असताना ते आज प्रसार माध्यमांशी बोलत होते.
लोणकर कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सांत्वन करताना मुख्यमंत्री म्हणाले…
तसेच, “प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते पक्षाची भूमिका मांडत असतात. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. मात्र या निवडणुकांना अजून बराच वेळ आहे. हे असे निर्णय त्या वेळच्या परिस्थितीनुसार पक्षश्रेष्ठी ठरवत असतात. मात्र, पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी अशी भूमिका मांडली असेल. मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या वक्तव्यांचा अर्थ काढून, या सरकारमध्ये मतभेद असल्याचे सांगण्याचा विरोधकांकडून उद्योग सुरू आहे. आमच्यात उत्तम संवाद असून, पुढची साडेतीन वर्षेही हे सरकार पूर्ण करेल,” असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
राष्ट्रवादीने केली खेळी, इंदापूरात भाजपला मोठा धक्का! वाढले राजकीय बळ
दुसरीकडे, पटोलेंच्या सातत्याने केल्या जाणाऱ्या स्वबळाच्या घोषणेमुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि या सरकारचे निर्माते शरद पवार आणि इतर काही ज्येष्ठ नेते देखील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यातच वडेट्टीवारांनी अप्रत्यक्षपणे पटोले यांच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने, स्वबळावर निवडणुका लढवण्याबाबत काँग्रेस पक्षातच एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावरवून काँग्रेसमध्ये दोन गट आहेत का? आणि काँग्रेस खरंच आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार का?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
Read Also :
- …अशाप्रकारे फडणवीसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले, भाजप हा ओबीसींचाच पक्ष आहे
- पुण्यातल्या आढावा बैठकीत अजित पवारांनी केले, राज्याच्या महामारी परिस्थितीबद्दल भाष्य
- मोठी बातमी! ईडीकडून अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त
- पुणे महापालिकेच्या २३ गावांचा विकास आराघडा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला – अजित पवार
- पुन्हा एक झटका : अजित पवारांसह अनिल परबांची CBI चौकशी होणार, उच्च न्यायालयात याचिका दाखल