मुंबई : एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना, काही दिवसांपूर्वी पुण्यात घडली आणि त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांच्या भरतीचा आणि परीक्षेचा प्रश्न प्रकर्षाने सरकारसमोर आला आणि चर्चेला येऊ लागला. तसेच, विरोधी पक्षाने देखील यावरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले.
राष्ट्रवादीने केली खेळी, इंदापूरात भाजपला मोठा धक्का! वाढले राजकीय बळ
दरम्यान, या घटनेनंतर सर्वपक्षीय नेत्यांनी स्वप्निलच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर आता स्वप्नीलच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची, सहयाद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावेळी त्यांनी, “आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. काळजी करू नका,” अशा शब्दांत कुटुबियांना धीर दिला आहे. तसेच स्वप्नीलच्या बहिणीला सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल,” असे आश्वासनही दिले.
…अशाप्रकारे फडणवीसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले, भाजप हा ओबीसींचाच पक्ष आहे
या प्रसंगावेळी मुख्यमंत्र्यांसोबत विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.
मात्र, त्याच्या आत्महत्येने काही सवाल या यंत्रणेवर उपास्थित केले आहेत, ते राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार अस्तित्वात असले तरीही उपस्थित होतात, ते असे की स्वप्नीलने टोकाचं पाऊल का उचललं? एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे सगळं काही ऑनलाईन सुरु असताना, सरकार आणखीन काही पर्याय यासाठी का शोधू शकली नाही?
पुण्यातल्या आढावा बैठकीत अजित पवारांनी केले, राज्याच्या महामारी परिस्थितीबद्दल भाष्य
सरकारची जबाबदारी काय आहे? उद्या राज्याच्या प्रशासनात अधिकारी म्हणून रुजू होणाऱ्या या पोरांपैकी, अजून एखाद्या पोराने दुर्दैवाने असं टोकच पाऊल उचललं तर? रिक्त जागांचा आणि परीक्षेचा प्रश्न सरकार कसा आणि कधी सोडवणार? या प्रश्नांच्या उत्तराची वाट विद्यार्थी पाहत आहेत.
Read Also :
- लोकसंख्या पाहता पुणे शहरात दोन महानगरपालिका अस्तित्वात आणणे गरजेचे – रामदार आठवले
- मोठी बातमी! ईडीकडून अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त
- पुणे महापालिकेच्या २३ गावांचा विकास आराघडा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला – अजित पवार
- तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास महाराष्ट्र सज्ज, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर एकच धोरण ठरवा – मुख्यमंत्री
- पुन्हा एक झटका : अजित पवारांसह अनिल परबांची CBI चौकशी होणार, उच्च न्यायालयात याचिका दाखल