अहमदनगर: नुकताच खासदार सुजय विखे यांनी श्रीगोंदा तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आमदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आमदार लंके आणि आमदार पवार यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आम्हीही कोरोनाच्या संकट काळात भरपूर कामे केली मात्र कधीही गाजावाजा केला नाही असा टोला देखील त्यांनी दोन्ही आमदारांना मारला होता. यानंतर आमदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर विखेंच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली होती.
हे पण वाचा, मोठी बातमी: आता मोदी सरकार रेल्वेच्या जमिनी विकणार!
हे पण वाचा, महाविकास आघाडीच्या नाटकीपणापासून आत्ताच सावध व्हा; खासदार सुजय विखेंचे जनतेला आवाहन
आमदार निलेश लंके यांचे नगर लोकसभा क्षेत्रात वाढणारे प्राबल्य बघता खासदार सुजय विखे धास्तावले आहे आणि उठसुठ टीका करत आहेत असा सूर कार्यकर्त्यांनी आवळला होता. यानंतर आता आमदार निलेश लंके यांनी पुढे येत यासंदर्भात वक्तव्य केले आहे. जिल्ह्यातील तसेच इतर भागातील १७ हजार रुग्णांना कोविड सेंटरच्या माध्यमातून मोफत उपचार दिला. गोरगरीब जनतेचे कोट्यवधी रुपये वाचवले. काही रुग्णालयांत डिपॉझिट भरल्याशिवाय रुग्णांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका करू नये असा स्पष्ट इशारा आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखेंना दिला आहे.
हे पण वाचा, पारनेर कारखाना पुन्हा सहकारात रुजू करण्यासाठी आमदार निलेश लंकेचे एक पाऊल पुढे
हे पण वाचा,“शिर्डीत रोजच विश्वस्त मंडळ जाहीर होतंय, सरकारला वाटेल तेव्हा ते नेमणूक करणार” सुजय विखे
पळशी येथे वनकुटे, खडकवाडी, वडगाव सावताळ, देसवडे व मांडवे खुर्द गावांतील अनुसूचित जाती जमातिच्या लाभार्थ्यांना किराणा किट व अन्नधान्य वाटप करण्यात आले, त्यावेळी आमदार लंके बोलत होते. आमदार निलेश लंके म्हणाले, की कोरोना काळात काहींनी दिखाऊपणा केला . रेमडेसिव्हिरचा काहींनी काळाबाजार केला तर काहीजणांनी डिपॉझिट भरल्याशिवाय रुग्णालयात प्रवेश मिळणार नसल्याचे सांगितले. भाळवणीमधील कोविड सेंटरमध्ये मात्र आम्ही रुग्णांना मोफत उपचार देऊन बरे केले . आमच्याकडे शिक्षण संस्था, रूग्णालय, कारखाना नसेल, मात्र प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येत आहे , हे विसरू नका.
हे पण वाचा,
आमदार निलेश लंकेंच्या दक्षिण स्वारीमुळे दिग्ग्ज नेते हैराण; स्वकीय नेते देखील चिंतातुर अवस्थेत
‘माणुसकीचं नातं कसं असावं हे निलेश लंकेंनी दाखवलं’
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील