मुंबई : नुकत्याच मोदी सरकारच्या झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारात ओबीसी नेत्यांचा भरणा आहे. यात राज्यातून नारायण राणे आणि इतर काही महत्वाच्या नेत्यांसोबतच खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव देखील चर्चेत होते. मात्र, त्यांचा या विस्तारात समावेश करण्यात आला नाही आणि त्यामुळे, मुंडे भगिनींना जाणूनबुजून भाजपकडून डावलण्यात येत आहे, अशी समर्थकांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांनी एकामागोमाग एक आपले राजीनामे देण्यास सुरुवात केली.
लोणकर कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सांत्वन करताना मुख्यमंत्री म्हणाले…
दरम्यान, या ‘नाराजी’ आणि ‘राजीनामा’ नाट्यांनंतर पंकजा मुंडे यांनी स्वतःच, या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या सगळ्या चुकीच्या चर्चांना पूर्णविराम देत, पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देखील नामंजूर केले. मात्र, यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि त्यात ओबीसी नेत्यांना कसे डावलले जाते, या चर्चांना उधाण आले.
राष्ट्रवादीने केली खेळी, इंदापूरात भाजपला मोठा धक्का! वाढले राजकीय बळ
त्यातच आज केंद्रीय मंत्री सामाजिक समाजकल्याण मंत्री रामदास आठवलेंनी, एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना, “देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर मोठा खुलासा केला असून, पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीसांच्यावर नाराज आहेत. मात्र चर्चेतून त्यांची नाराजी लवकरच दूर होईल. त्यामुळे, पंकजा मुंडेंनी फडणवीसांना लक्ष्य करू नये,” असं वक्तव्य केलं आहे.
…अशाप्रकारे फडणवीसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले, भाजप हा ओबीसींचाच पक्ष आहे
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या भगिनींना भाजप सातत्याने डावलत आहे, असा आरोप भाजपवर इतर पक्षांकडून केला जात आहे. “भाजपत ओबीसींना डावललं जातं, फडणवीसांनी मला त्रास दिला,” असा थेट आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करताना केला होता. यातच आता रामदास आठवलेंच्या या वक्तव्याने भाजपत खरंच ओबीसी नेत्यांना डावलले जाते, की फडणवीसांच्या नेतृत्वात असल्यामुळे भाजपत हे घडत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
Read Also :
- अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद विखेंना योग्य वेळी दाखवून देऊ; आमदार निलेश लंकेचा जोरदार हल्लाबोल
- पुण्यातल्या आढावा बैठकीत अजित पवारांनी केले, राज्याच्या महामारी परिस्थितीबद्दल भाष्य
- लोकसंख्या पाहता पुणे शहरात दोन महानगरपालिका अस्तित्वात आणणे गरजेचे – रामदार आठवले
- मोठी बातमी! ईडीकडून अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त
- पुणे महापालिकेच्या २३ गावांचा विकास आराघडा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला – अजित पवार