मुंबई : राष्ट्रवादीचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड सध्या या ना त्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. यातच त्यांनी माझ्यावर आता 376 ची तयारी सुरू केली जात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋुता आव्हाड यांनी देखील अशाच पद्धतीचा ट्विट केला आहे.
“आता शाहू, फुले, आंबेडकर ऐवजी जहांगीर, औरंगजेब, बाबर… म्हणणार बहुतेक NCP वाले”
354 चा कट फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 376 ची तयारी सुरू केली आहे. 354 मध्ये नाट्यपुर्ण भूमिका घेणाऱ्या आता या कटातही आघाडीवर आहेत. आज दुपारी त्या मंत्रालयासमोर गाडीत बसलेला व्हि़डीओमते कोणाला भेटल्या. कशा भेटल्या चर्चा मंत्रालयात सुरू आहे. असं जितेंद्र आव्हाड एका गाडीत बसलेल्या महिलेचा व्हिडीओ ट्विट करत सांगितलं होतं.
“सत्ताधारी पक्षांकडून गलिच्छ राजकारण, आता हे राजकारण थांबवावं,;” सुप्रिया सुळे
त्यातच आता जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋुता आव्हाड यांनीही ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मला आत्ताच सुत्रांकडून कळलं की 354 नंतर 376 चा आरोप करण्यासाठी महिला तयार करण्याचा घाट घातला जात आहे. खात्रीलायक व्यक्तीने हे सांगितलं आहे. तसेच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलं आहे.
“आता बावनकुळेंच्या जीं च्या फुली मारलेल्या फोटोला भाजप जोडो मारो आंदोलन करेल का ?”
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी परत आज एक ट्विट केलं आहे. मी कधीच कुणावर वैयक्तीक कंबरे खाली वार करत नाही, कुणाचे नाव घेऊन टीका करत नाही. पण माझ्यावर हल्ला केल्यास मला प्रतिउत्तर द्यावे लागेल. तेव्हा एकमेकांनवर वैयक्तिक हल्ला करू नका, असा सुचक इशारा आव्हाडांनी दिला आहे.
मला आत्ताच सूत्रांकडून कळलं की 354 नंतर, 376 ( बलात्कार) चा आरोप करण्यासाठी महीला तयार करण्याचा घाट घातला जात आहे.
खात्रीलायक व्यक्तिने हे सांगितलं आहे. @Dev_Fadnavis— Ruta Samant (@RutaSamant) January 5, 2023
Read also
- “कधीच कुणावर वैयक्तीक कंबरेखाली वार करत केला नाही, जर मला..” जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
- मुंबई फिल्मसिटी युपीला जाणार असल्याच्या आरोपावर योगीचं उत्तर, म्हणाले, मुंबई ही..
- “‘टिल्लू’ च्या वर्मावर घाव बसलाय”; राष्ट्रवादीचा नितेश राणेंना खोचक टोला
- शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण? छगन भुजबळांचा सवाल
- “महाराष्ट्राच्या इतिहासात पळवापळवीला थारा देणारे एवढे कमजोर नेते कधीचं झाले नसतील”