मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात गुंतवणुक वाढवण्यासाठी काही उद्योगपतींशी भेट घेणार आहेत. यातच काल त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावरून राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
टिल्ल्या म्हणून डिवचल्यानंतर अजित पवारांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “मला देवाने..;”
एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी महाराष्ट्राची सुत्र हाती घेतल्यापासून कोणी महाराष्ट्रातील गावे पळवतोय, कोणी उद्योग पळवतोय, आता तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातून चित्रपटसृष्टी, उद्योग पळवायला आले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पळवापळवी थारा देणारे एवढे कमजोर नेते कधीचं झाले नसतील. अशी टिका सुरज चव्हाण यांनी केली आहे.
“तेव्हा मिर्झाराजे जयसिंगची भूमिका तीच आजच्या काळात औरंगजेबासोबत बावनकुळेंची”
आज मुंबईत योगी आदित्यनाथ रोड शो करणार आहे. मुंबईच नव्हे तर देशातील नऊ शहरांमध्ये त्यांचे रोड शो होणार असून त्यात राज्यातील गुंतवणूक संधीबाबत ते चर्चा करणार आहेत. यामध्ये ते टाटा समुह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, महिंद्रा, गोदरेज, आदित्य बिर्ला समुह, बाॅंबे डाईंग, ब्रिटानिया, जेएसडब्ल्यू समुह, एशियन पेंटस्, हिताची, हिरानंदानी, कोका-कोला, मारूती सुझुकी, अशोका लेलॅंड्स, ओस्वाल इंडस्ट्रीजसह अनेक कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि ज्येष्ठ उद्योगतींशी चर्चा करणार आहेत.
“इडीकडून अनिल परबांवर 10 कोटीची टाच, सगळ्यांना त्याची किमंत चुकवावी लागले”, अनिल परबांचा इशारा
दरम्यान, उत्तर प्रदेशात देखील महाराष्ट्र भवन व्हावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी म्हटलं होतं. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ यांच्यात झालेल्या भेटीत महाराष्ट्र भवन उत्तर प्रदेशात उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर मुंबई पेक्षा मोठी फिल्मसिटी उत्तर प्रदेशमध्ये उभारू, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलंय.
एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी महाराष्ट्राची सूत्र हाती घेतल्यापासून कोणी महाराष्ट्रातील गावे पळतोय,कोणी उद्योग पळतोय,आता UP चे मुख्यमंत्री योगीजी महाराष्ट्रातून चित्रपटसृष्टी,उद्योग पळवायला आले आहेत.महाराष्ट्राच्या इतिहासात पळवापळवी थारा देणारे एवढे कमजोर नेते कधीचं झाले नसतील.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) January 5, 2023
Read also
- “आता शाहू, फुले, आंबेडकर ऐवजी जहांगीर, औरंगजेब, बाबर… म्हणणार बहुतेक NCP वाले”
- “सत्ताधारी पक्षांकडून गलिच्छ राजकारण, आता हे राजकारण थांबवावं,;” सुप्रिया सुळे
- “आता बावनकुळेंच्या जीं च्या फुली मारलेल्या फोटोला भाजप जोडो मारो आंदोलन करेल का ?”
- ठाकरेंची ताकद वाढतेय…! डोंबिवलीतील राष्ट्रवादीचे 11 पदाधिकांऱ्याचं शिवसेनेत प्रवेश
- “योगी महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करतात, त्यावर राज ठाकरे गप्प का?”