मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठी फुट पडली. त्यानंतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सामील झाले. परंतु दुसरीकडे अनेक राजकीय संघटना, कार्यकर्ते, माजी आजी आमदार, खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. यातच डोंबिवलीतील जवळपास 11 पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
“आव्हाडांचा मुंब्रारक्षक उल्लेख करत नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र”, म्हणाले…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संघटनात्मक शक्तीवर विश्वास ठेवत बुधवारी डोंबिवलीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीतील सुमारे 11 पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधून घेतलं. जनतेची कामे करा, असे यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
“गाडीचा चक्काचुर, डोक्यावर गमजा, अन् अंगावर शाल, धंनजय मुंडे मुंबईकडे रवाना?”
अलिकडचे पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटासोबत त्यांनी युती केली आहे. त्यासाठी जोगेंद्र कवाडे यांनी एक पत्रक काढलं आहे. त्यात त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महायुतीत पीआरपीचाही समावेश झाला आहे. या महायुतीचा राज्याच्या राजकारणावर किती परिणाम होतो आणि या महायुतीला दलित समाजाचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांच लक्ष आहे.
Read also
- “योगी महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करतात, त्यावर राज ठाकरे गप्प का?”
- टिल्ल्या म्हणून डिवचल्यानंतर अजित पवारांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “मला देवाने..;”
- “तेव्हा मिर्झाराजे जयसिंगची भूमिका तीच आजच्या काळात औरंगजेबासोबत बावनकुळेंची”
- “इडीकडून अनिल परबांवर 10 कोटीची टाच, सगळ्यांना त्याची किमंत चुकवावी लागले”, अनिल परबांचा इशारा
- मोठी बातमी..! अनिल परबांवर इडीची मोठी कारवाई, तब्बल 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त