मुंबई : संभाजी महाराज हे धर्मवीर कधीच नव्हते, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. त्यावरून भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचेच आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील औरंगजेब हा क्रुर आणि हिंदुद्वेष्टा नव्हता. असं वक्तव्य केलं. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी आव्हाडांना पत्र पाठवले आहे.
“2024 ला 200 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा निवडून येतील”, चंद्रशेखर बावनकुळे
जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख मुंब्रारक्षक करत नितेश राणे यांनी पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आपण औरंग्याबाबत औरंगजेब क्रुर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना? असे केलेले वक्तव्य स्वाभिविकरच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे.
“धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात, पुढील उपचारासाठी मुंबईत हलवणार “
कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही. किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळले नाही. काकाप्रमाणे पुतण्याही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे घोषित करतो.
“मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अशक्य, हे सरकार पडणार म्हणजे पडणारच”
औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्या तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले. आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
To @Awhadspeaks pic.twitter.com/xXOkHbdnpM
— nitesh rane (@NiteshNRane) January 4, 2023
Read also
- “गाडीचा चक्काचुर, डोक्यावर गमजा, अन् अंगावर शाल, धंनजय मुंडे मुंबईकडे रवाना?”
- मै झुकेगा नहीं साला..! फडणवीस, शहा, अन् केसरकारांना टॅग करून राऊतांचं आवाहन
- “माझ्या विधानावर ठाम, अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारा”; अजित पवार
- “फडणवीसांकडून जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत”; राज्यात आणखी एक नवा वाद
- “तर दिपक केसरकरांनी 2024 मध्ये तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी”