मुंबई : मागील 6 महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील रेस्टोरेंट लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हॉटेल, उपहार गृह सुरू करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र अद्याप मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी काय आकाशातून उडत कामावर यायचे का ? असा सवाल मनसेने केला आहे.
#Unlock5 सुरू होणार आहे मुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार आहेत. तिथे काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं???????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 29, 2020
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, अनलॉक-5 सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार आहोत. तिथे काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय ? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं ?, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
दरम्यान, ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंटही खुली होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांच्या प्रतिनिधींशीसोबत झालेल्या बैठकीत दिले आहेत.