मुंबई : ४ ऑगस्ट, राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील ७८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कायदा-सुव्यवस्था, गुप्तवार्ता, गुन्ह्यांचा तपास, आपत्कालीन परिस्थितीतील मदतकार्य, नागरिकांशी संवाद-सौहार्द अशा अनेक आघाड्यांवर जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दलांपैकी असलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची क्षमता, गुणवत्ता, दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. पदकविजेत्या पोलिसांचा राज्याला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचं कौतुक केले असून यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उल्लेखनीय सेवेबद्दल अग्निशमनसेवा शौर्यपदक विजेत्या राज्यातील आठ अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील १ हजार ३८० पोलिसपदकांची घोषणा केली. राज्यातील ७८ पोलिसांना ही पदकं जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र पोलिसांना शौर्याची, त्यागाची, देशसेवेची, बलिदानाची प्रदीर्घ, गौरवशाली परंपरा आहे.
राज्यपालांवर भाजपचा दबाव, त्यांनी स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरून घेऊ नये!” राऊतांची खरमरीत टीका
गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र पोलिसांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोलाचं योगदान दिलं आहे. महाराष्ट्र पोलिसांची देशसेवेची ही गौरवशाली परंपरा पुढे नेणाऱ्या राज्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘पोलीस शौर्यपदक’, ११ अधिकाऱ्यांना ‘उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक’, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘पोलीस पदक’ जाहीर आहे. अग्निशमन सेवेतील ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची ‘अग्निशमन सेवा शौर्यपदकां’साठी निवड झाली आहे. पदकविजेत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्राला अभिमान असून यापुढील काळातही त्यांच्याकडून अशीच देशसेवा घडत राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
Read Also :
- “देशात ७५ नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार”; स्वांतत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
- बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी मी आत्महत्या करेल; खासदार डॉ. अमोल कोल्हे आक्रमक
- शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली
- …तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल; स्वातंत्र्यादिनी मुख्यमंत्र्यांचा इशारा
- शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर कायद्याच्या कचाट्यात; लवकरच होणार चौकशी, वाचा काय आहे प्रकरण…