मुंबई : राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानपरिषदेतील १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबतच्या वादावरून वाकडे आहे. दरम्यान, हा वाद आता कोर्टात असून, आज त्यावरील सुनावणी झाली असता, कोर्टाने या संदर्भातील याचिका निकाली काढली आहे.
“राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर जातीयवाद वाढीस लागला,”- राज ठाकरे; राष्ट्रवादीकडून दिली गेली प्रतिक्रिया
या पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर खरमरीत टीका केली आहे. “घटनात्मक पेचप्रसंग राज्यपालांकडून निर्माण होऊ नये, असं कोर्टाने अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. त्यामुळे, त्यांनी स्वत:चा राजकीय प्यादं म्हणून वापर होऊन देऊ नये. ते पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते, संघाचे प्रचारक असू शकतात. त्यावर आमची काही भूमिका नाही. पण ते घटनेनुसार राज्यांच्या, कॅबिनेटच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असतील, तर या देशाच्या संघराज्यावर हा हल्ला आहे.”
राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या वादाची याचिका, हायकोर्टाने निकालात काढली; दिला अनपेक्षित निर्णय
तसेच, “हे राज्यपाल प्रेमळ, मनमिळाऊ आहेत. मी त्यांना ओळखतो. आम्ही एकत्र काम केलं आहे. पण त्यांची भूमिका ही राजकीय आहे, याची जाणीव त्यांनाही आहे. ते मनापासून हे करत नसावेत. पण शेवटी ज्या पक्षाकडून त्यांची नेमणूक झाली. त्या पक्षाच्या दबाव त्यांच्यावर असू शकतो. त्यानुसार ते काम करत असावेत. खरं तर त्यांनी हा दबाव झुगारुन घटनेचा रखवालदार असल्याची भूमिका घेतली पाहिजे,” असा हल्लबोल त्यांनी केला.
महाविकास आघाडीला शह देण्यासाठी ‘बिग ४’ तयार, १६ ऑगस्टपासून भाजपचं मिशन ‘जन आशीर्वाद’
“राज्यपाल या जागा दीर्घकाळासाठी रिक्त ठेवू शकत नाहीत. त्यांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही निरीक्षणे केली आहेत. विशिष्ट कारणांसाठी ही पदे रिक्त ठेवली गेली असतील, तर त्यांची कारणीमिमांसा गरजेची आहे”, असं हायकोर्टाने नमूद केलं आहे. मुख्यमंत्री-राज्यपाल यांच्यात समन्वय हवा. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला हवं. मात्र ते कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे याबाबतीत कोर्टही त्यांना निर्देश देऊ शकत नाही,” असं त्यांनी नमूद केलं आहे.
Read Also :
- परमबीर सिंह यांना दोन प्रकरणात लूक आऊट नोटीस, कोणत्याही क्षणी बेड्या पडण्याची शक्यता
- मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडवल्या, इथेही वसुली सुरु आहे का? आशिष शेलारांची बोचरी टीका
- युती सरकारच्या काळात झालेल्या कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात आला नवा ट्विस्ट
- “संसदेत विरोधकांनी केलेल्या कृतीचे पवार समर्थन करतात का? त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे’’
- “महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर वाढीस लागला,” राज ठाकरेंचे मोठे विधान