मुंबई : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात राज्यातून भाजपच्या चार नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर, भाजपने आता राज्यात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील या चारही नेत्यांना घेऊन, भाजप ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरू करणार असून, त्या माध्यमातून भाजप संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे.
राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या वादाची याचिका, हायकोर्टाने निकालात काढली; दिला अनपेक्षित निर्णय
राज्यात भाजपकडून येत्या १६ ऑगस्टपासून, राज्याच्या वेगवेगळया भागात ही यात्रा काढण्यात येणार असून, याद्वारे चारही नेते जनतेशी संवाद साधणार आहेत. कपिल पाटील यांची यात्रा १६-२० ऑगस्ट, भारती पवार १६-२० ऑगस्ट, डॉ. भागवत कराड १६-२१ ऑगस्ट, तर नारायण राणे यांची यात्रा १९-२५ ऑगस्ट या काळात निघणार आहे, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आज दिली.
मुख्य प्रवक्ते श्री. केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद. https://t.co/I7fGzmEh4x
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 13, 2021
या पूर्ण ‘जन आशीर्वाद’ यात्रेदरम्यान प्रत्येक खासदाराचा प्रवासही यावेळी सांगितलं असून, पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्यात ५७० कि.मी.चा प्रवास करणार आहे. डॉ.पवार यांची यात्रा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ५ लोकसभा मतदारसंघात ४३१ कि.मी. प्रवास करणार आहे, तर कराड यांची यात्रा मराठवाड्यातील ७ लोकसभा मतदार संघात ६२३ कि.मी.चा प्रवास आणि राणे यांची यात्रा मुंबई, वसई- विरार महापालिका क्षेत्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एकूण ६५० कि.मी. प्रवास करणार आहे.
“राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर जातीयवाद वाढीस लागला,”- राज ठाकरे; राष्ट्रवादीकडून दिली गेली प्रतिक्रिया
दरम्यान, भाजपच्या या रणनीतीमुळे, राज्यातील महाविकास आघाडीला शह देण्यासाठीच भाजपने हा निर्णय घेतल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून भाजप पक्ष बळकटीकरणावर जोर देणार असून, एकीकडॆ संघटन बांधणी तर दुसरीकडे जनतेशी संवाद, अशाप्रकारे ‘एकाच दगडात दोन हेतू’ भाजप या माध्यमातून साधणार आहे. त्यामुळे, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घडत असल्याने त्याचा परिणाम काय होईल, हे येत्या काळात दिसेलच!
Read Also :
- पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक
- सरकारला सत्तेचा माझं आहे, पुणे पोलिसांची भूमिकाही दुपट्टी; चित्रा वाघ कडाडल्या
- परमबीर सिंह यांना दोन प्रकरणात लूक आऊट नोटीस, कोणत्याही क्षणी बेड्या पडण्याची शक्यता
- मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडवल्या, इथेही वसुली सुरु आहे का? आशिष शेलारांची बोचरी टीका
- “संसदेत विरोधकांनी केलेल्या कृतीचे पवार समर्थन करतात का? त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे’’